शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ची निवडणूक लवकरच

By admin | Updated: January 30, 2016 02:45 IST

वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गत जुलै महिन्यातच होणार होती. परंतु या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली.

याचिका मागे : ४ फेब्रुवारीला होणार सुनावणीउमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गत जुलै महिन्यातच होणार होती. परंतु या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली. आता याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली असून ४ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे वसंतची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ गोठविण्यात आल्याने कारखान्याचे संचालक रणजित नलावडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जून महिन्यात ही याचिका दाखल केली होती. त्यामुळे वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लांबली होती. संपूर्ण विदर्भातील सहकारी तत्वावर चालणारा हा एकमेव कारखाना होय. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना आर्थिक डबघाईस आला आहे. थकीत वेतनामुळे कामगारही वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेत आहे. तर ऊस उत्पादकही थकीत बिलासाठी आंदोलने करीत आहे. वसंत संचालक मंडळ आणि शेतकरी-कामगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याच्या इतिहासात कधी नव्हे तेवढे वाद प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कार्यकाळात झाला आहे. अनेकदा वाद होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही गेले आहे. सध्याही कारखाना प्रशासन आणि कामगारात पाहिजे तसा समन्वय दिसत नाही. त्यातच यंदा गळीत हंगामही खूप उशिरा सुरू झाला. परिणामी इतर कारखान्यांनी वसंतचा ऊस पळविला आहे. या ना त्या कारणाने साखर कारखाना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशा या कारखान्याची निवडणूक जुलै २०१५ मध्ये होणार होती. परंतु ९७ घटना दुरुस्तीनुसार कारखान्यातील आर्थिक दुर्बल घटकमधून निवडून येणाऱ्या संचालकाचा मतदारसंघच गोठविण्यात आला होता. त्यामुळे रणजित नलावडे यांनी जून महिन्यात याचिका दाखल केली. परिणामी निवडणूक लांबणीवर पडली. उमरखेड, पुसद, महागाव, हिमायतनगर, हदगाव या पाच तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांंना आपल्या हालचाली थांबविण्याची वेळ आली होती. परंतु याचिकाकर्ते रणजित नलावडे यांनी ही याचिका मागे घेण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे आता वसंत कारखान्याची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)