शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

६५ ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Updated: March 13, 2016 02:56 IST

कार्यकाळ संपणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. ६५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर, ८० ग्रामपंचायतींची पोटनिवडणुक पार पडणार आहे.

१७ एप्रिलला मतदान : ८० ठिकाणी पोटनिवडणुकायवतमाळ : कार्यकाळ संपणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. ६५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर, ८० ग्रामपंचायतींची पोटनिवडणुक पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मे ते आॅगस्टमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये आठ तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, नव्याने स्थापन झालेल्या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. ८० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा यात समावेश आहे.१८ मार्चला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल. २९ मार्चपासून २ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. ४ एप्रिलला अर्जाची छाननी केली जाणार आहे. ६ एप्रिलला नामनिर्देशनपत्र परत घेण्याची अंतिम तारीख असून याच दिवशी चिन्हांचे वितरण करण्यात येणार आहे. १७ एप्रिलला मतदान होणार आहे. २१ एप्रिलला निकाल घोषित केला जाणार आहे. आठ तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. यात आर्णी तालुक्यातील दातोडी, खडका, उमरी कापेश्वर ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मारेगावातील कन्हाळगाव, जळका, सगणापूर, मच्छीद्रा, वरूड, डोलडोंगरगाव, सराटी, गोधणी, वागदरा, खंडनी आणि अर्जुनी अशा ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. झरीजामणीतील हिवरा बारसा, शिबला, निमणी, अडकोली, जामणी, खरबडा, माथार्जुन, दाभा, कारेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. केळापूर तालुक्यातील खैरगाव, अकोली बु., मारेगाव मोरवा, पढा, ताड उमरी, वाघोली, बोथ, झुली, मिरा, खैरगाव (दे), धारणा, घोडदरा, दाभा, मोहदा, करंजी रोड, केगांव, आसोली, मराठवाकोडी, सुसरी, भाडउमरी, कारेगांव बंडल, मुझाळा, कोठाडा, मंगी, डोंगरगाव तर राळेगाव तालुक्यातील वाटखेड, चोंडी, खैरगाव, खेमकुंड, पळसकुंड, एकुर्ली, आठमुर्डी, कारेगांव, चिखली, सावनेर या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. घाटंजीतील पारवा, घोटी, टिटवी, राजूरवाडी, ताडसावळी, कोळी (खु) आणि कळंब तालुक्यातील थाळेगाव व महागाव तालुक्यातील कोनदरीचा यामध्ये समावेश आहे. ८० ग्रामपंचायतींची पोटनिवडणूकजिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये सर्वाधिक १५ ग्रामपंचायती पुसद तालुक्यातील आहे. राळेगाव १२, दारव्हा ४, केळापूर २, कळंब ४, बाभूळगाव ५, वणी १०, दिग्रस २, आर्णी २, नेर १, मारेगाव ७, घाटंजी ६, यवतमाळ ७ तर महागाव तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. (शहर वार्ताहर)