शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प

By admin | Updated: December 31, 2015 02:41 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे.

भारतीय जैन संघटना : जिल्ह्यातून ५० विद्यार्थ्यांची होणार निवडयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अशा ५० मुलांची निवड करून त्यांच्या पाचवी ते बारावी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही संघटना घेणार आहे. त्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात भारतीय जैन संघटनेचे गेल्या दोन दशकांपासून अव्याहत कार्य सुरू आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुण्यातील वाघोली येथे सुसज्ज असा शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. खिल्लारीमध्ये भूकंप झाला त्यावेळी तेथील आपद्ग्रस्त कुटुंबातील तब्बल १२०० मुलांची जबाबदारी या संघटनेने घेतली. त्यांना वाघोलीच्या केंद्रात ठेवून त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मेळघाटातही आदिवासी मुलांना अशाच प्रकारे मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न भारतीय जैन संघटनेतर्फे करण्यात आले.कोणत्या विद्यार्थ्यांची होणार निवड ?भारतीय जैन संघटना पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची या प्रकल्पासाठी निवड करणार आहे. ज्या शेतकरी कुटुंबात २०१४ व २०१५ या वर्षात वडीलाने किंवा आजोबाने आत्महत्या केली आहे, अशा कुटुंबातील मुलांची व मुलींची निवड केली जाणार आहे. वाघोली, पुणे येथे शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा सोबतच भारतीय जैन संघटनेचे सर्व सोयीयुक्त वसतिगृह आहे. तेथे या मुलांच्या राहण्याची-जेवणाची, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची, आरोग्याची तसेच मुलांचा सर्वंकक्ष विकास व्हावा, यासाठी सर्व व्यवस्था असतील. तर शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात अत्यंत आल्हाददायक वातावरणात त्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार आहे.