शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प

By admin | Updated: December 31, 2015 02:41 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे.

भारतीय जैन संघटना : जिल्ह्यातून ५० विद्यार्थ्यांची होणार निवडयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अशा ५० मुलांची निवड करून त्यांच्या पाचवी ते बारावी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही संघटना घेणार आहे. त्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात भारतीय जैन संघटनेचे गेल्या दोन दशकांपासून अव्याहत कार्य सुरू आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुण्यातील वाघोली येथे सुसज्ज असा शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. खिल्लारीमध्ये भूकंप झाला त्यावेळी तेथील आपद्ग्रस्त कुटुंबातील तब्बल १२०० मुलांची जबाबदारी या संघटनेने घेतली. त्यांना वाघोलीच्या केंद्रात ठेवून त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मेळघाटातही आदिवासी मुलांना अशाच प्रकारे मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न भारतीय जैन संघटनेतर्फे करण्यात आले.कोणत्या विद्यार्थ्यांची होणार निवड ?भारतीय जैन संघटना पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची या प्रकल्पासाठी निवड करणार आहे. ज्या शेतकरी कुटुंबात २०१४ व २०१५ या वर्षात वडीलाने किंवा आजोबाने आत्महत्या केली आहे, अशा कुटुंबातील मुलांची व मुलींची निवड केली जाणार आहे. वाघोली, पुणे येथे शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा सोबतच भारतीय जैन संघटनेचे सर्व सोयीयुक्त वसतिगृह आहे. तेथे या मुलांच्या राहण्याची-जेवणाची, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची, आरोग्याची तसेच मुलांचा सर्वंकक्ष विकास व्हावा, यासाठी सर्व व्यवस्था असतील. तर शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात अत्यंत आल्हाददायक वातावरणात त्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार आहे.