शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षण’ला रिक्त जागांचे ग्रहण

By admin | Updated: August 17, 2015 02:36 IST

येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. गटशिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पदच गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत.

वणी : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. गटशिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पदच गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. प्रभारावरच शिक्षण विभागाचा गाडा ओढला जात आहे. विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचीही अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.तालुक्यात २२३ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. त्यामध्ये ३७ हजार विद्यार्थी पहिली ते बारावीमध्ये शिकत आहे. शासन व प्रत्यक्ष शाळा यांना सांधणारा दुवा म्हणून पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग काम पाहातो. आता तर सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान, या दोन उपक्रमाद्वारे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यासाठी या यंत्रणेमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांची गरज असते. तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी हा जबाबदार अधिकारी असतो. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पदच रिक्त आहे.विस्तार अधिकारी किंवा लगतच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांकडे प्रभार देऊन काम निभावले जात आहे. प्रभारावर असतानाच एका विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती. त्यानंतर मारेगावचे गटशिक्षणाधिकारी जी.एस. खोले यांच्याकडे प्रभार देण्यात आला. याच तालुक्यातून शिक्षकी पेशातून पदोन्नतीद्वारे गटशिक्षणाधिकारी झाल्याने खोले यांना या तालुक्यातील शैक्षणिक वाटचालीची जाण होती. त्यामुळे त्यांनी मारेगाव तालुक्यासोबत वणी तालुक्याचा गाडाही व्यवस्थित हाकला. परंतु ३१ जुलैला त्यांचीही सेवानिवृत्ती झाली. आता पुन्हा विस्तार अधिकारी मेश्राम यांच्याकडे प्रभार आला आहे. येथे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पाच पदे मंजूर आहेत. परंतु केवळ तीनच विस्तार अधिकारी उरले आहेत. त्यापैकीही एका विस्तार अधिकाऱ्यांची येथून बदली झाली आहे. मात्र त्यांना अद्याप येथून कार्यमुक्त करण्यात आले नाही. एका विस्तार अधिकाऱ्याकडे गटशिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार आल्याने ते कामाच्या ओझ्याखाली दबले आहेत. आता उरलेले केवळ एकच विस्तार अधिकारी कोणकोणती कामे करतील, हा प्रश्नच आहे. त्यामुळे शैक्षणिक कामात व प्रगतीत वणी तालुका माघारत असल्याचे दिसून येते. तालुक्याचे १३ केंद्रांमध्ये शैक्षणिक विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रासाठी एका केंद्र प्रमुखाची गरज असते. मात्र येथे केवळ पाचच केंद्र प्रमुख कार्यरत आहे. त्यामुळे एका केंद्र प्रमुखांकडे दोन-तीन केंद्रांचा म्हणजेच २०-३० शाळांचा कार्यभार देण्यात आला आहे. परिणामी या केंद्र प्रमुखांचा कागदपत्रे गोळा करण्यात व संदेशवहन करण्यातच वेळ जात आहे. शाळांना भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देण्यास त्यांना सवडच मिळत नाही. वास्तविक विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना प्रत्यक्ष अध्यापन-अध्ययन प्रक्रियेकडे, सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाकडे लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा घडविण्याचे कार्य करायचे असते. मात्र अपुऱ्या मनुष्य बळामुळे विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना हे करू की ते करू, असे झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)