शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार विहिरींना ग्रहण

By admin | Updated: January 24, 2015 23:00 IST

जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जवाहर रोजगार आणि धडक सिंचन योजनेतून हजारो विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यातील चार हजार ४९१ विहिरींचे काम अर्ध्यावर थांबले आहे.

रोहयोत वर्ग : मोबदल्यावरून यंत्रणेत उदासीनतायवतमाळ : जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जवाहर रोजगार आणि धडक सिंचन योजनेतून हजारो विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यातील चार हजार ४९१ विहिरींचे काम अर्ध्यावर थांबले आहे. आता या विहिरींना पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेत रूपांतरित करण्यात आले आहे. अर्धवट काम झालेल्या विहिरींचे पैसे कोण देणार याबाबत शासकीय यंत्रणेत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे साडेचार हजार विहिरींनी ग्रहण लागले असून शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती आहे.धडक सिंचन योजनेतील विहिरींना पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्यात आले. त्यासाठी ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. शिवाय विहिरीचे अनुदानही अडीच लाखावरून तीन लाख रुपये करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ही योजना रूपांतरित करीत असतानाच्या तांत्रिक अडचणींकडे शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता अंमलबजावणी करताना मोठी समस्या निर्माण झाली आहे. धडक सिंचन योजनेतून दहा ते बारा फूट विहीर खोदलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. आता या अपूर्ण विहीरी रोजगार हमी योजनेत समाविष्ट केल्यानंतर नव्याने केलेल्याच खोदकामाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे झालेल्या कामाचे पैसे मागायचे कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. धडक सिंचन योजनेत एजन्सी म्हणून तब्बल १७ शासकीय कार्यालयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याला दिले आहेत. या सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने योजनेच्या रूपांतरणातच अडचणी निर्माण झाल्या आहे. धडक सिंचनच्या चार हजार ४९१ विहिरींपैकी तीन हजार ४ विहिरींना सुधारित प्रशासकीय मान्याता मिळाली आहे. उर्वरित एक हजार ४८७ विहिरींना अद्यापही प्रशासकीय मान्यता देण्यात आली नाही. कृषी अधीक्षकांच्या अधिनस्थ असलेल्या विहिरींना प्रशासकीय मंजुरी देण्याचा अधिकार तहसीलदारांना दिला आहे. प्रत्यक्षात मात्र तसे प्रस्तावच तहसीलदारांकडे पोहोचलेले नाही. त्यामुळे एकंदरच या योजनेत मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. प्रशासकीय मान्यतेची तारीख अथवा ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ असे दोन निकष या विहिरींच्या रूपांतरणासाठी लावले जात आहे. यातच गफलत होत असल्याने शेतकऱ्यांना झालेल्या कामाचा मोबदला मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांनी उधार-उसणवार करून विहिरींचे काम केले. मात्र तेही अर्धवट आहे. या कामांवर झालेल्या खर्चाचा मोबदला देणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)