शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांना जड वाहतुकीचे ग्रहण

By admin | Updated: May 29, 2014 02:52 IST

ग्रामीण भागातील गाव जोड रस्ते हे खर्‍या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण जीवनाला बर्‍याच अंशी कलाटणी मिळाली आहे.

यवतमाळ : ग्रामीण भागातील गाव जोड रस्ते हे खर्‍या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण जीवनाला बर्‍याच अंशी कलाटणी मिळाली आहे. तालुका, जिल्हा या ठिकाणी सहज ये-जा करण्यासाठी हे रस्ते रक्तवाहिनीचेच काम करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गाव जोड रस्त्यांना क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांचे ग्रहण लागले आहे. यामुळे काही आठवड्यातच रस्ते उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येते.

साधारणत: ग्रामीण भागातील रस्ते हे केवळ १0 टन वजनाच्या वाहतुकीसाठी योग्य असतात. सरासरी लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र या आधारावर या रस्त्यांची क्षमता निश्‍चित केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक होत आहे. काही ठिकाणी कोळसा खदानी, विटभट्टी, चुना भट्टी, सिमेंट फॅक्टरी उभारण्यात आल्या आहे. विशेष करून वणी, मारेगाव, झरी या तालुक्यांमध्ये हे खाण उद्योग केंद्रित झाले आहे. या गाव जोड रस्त्यावरून ३0 ते ४0 टन वजनाचे ट्रक ये-जा करतात. क्षमतेच्या दुप्पट वजन रस्त्यावरून नेण्यात येत असल्यामुळे काही आठवड्यातच हा रस्ता पूर्णत: नष्ट होतो. यामध्ये ग्रामीण भागातील वाहतूकही विस्कळीत होते. शिवाय जिल्हा परिषदेकडून मूलभूत सुविधेत अंतभरूत रस्ता वेळेच्या आधीच नष्ट होतो. यामुळे जिल्हा परिषदेच्या रस्ते निधीचाही अपव्यय होत आहे.ग्रामीण भागातील रस्ते नष्ट झाल्याने परिवहन महामंडळाने कित्येक गावांच्या बसफेर्‍या बंद केल्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांंंना पायपीट करत यावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. (प्रतिनिधी)