शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

ई-निविदांना जाचक अटीखाली लावला जातो सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:05 IST

निविदा मॅनेज होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेलाही आता लाचखोरांनी सुरुंग लावला आहे.

ठळक मुद्देमॅनेजचा नवा फंडा : यवतमाळ, बाभूळगाव, घाटंजी पालिकेतील प्रताप, नोंदणीकृत ठेकेदार सोडून नवख्यांना दिले जातेय कंत्राट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निविदा मॅनेज होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेलाही आता लाचखोरांनी सुरुंग लावला आहे. जाचक अटीच्या आड मर्जीतील ठेकेदारांना काम दिले जाते. बाभूळगाव नगरपंचायतीने तर चार लाखाच्या कामासाठी तब्बल ५८ अटी लादल्या आहे. यवतमाळ, घाटंजी नगरपरिषदेतही कमी-अधिक प्रमाणात असाच प्रकार सुरू आहे.ई-निविदेत छेडछाड करता येत नसल्याने प्रक्रिया मॅनेज करण्यासाठी अनावश्यक अटींचा आधार घेतला जातो. जेणे करून तीनपेक्षा कमीच निविदा येतील. त्यानंतर या निविदा रिकॉल केल्या जातात. तातडीच्या कामांच्या निविदा अशाप्रकारे रखडविण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी व नगरसेवकांचा दबाव वाढल्यानंतर घाईगडबडीत आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिले जाते. हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. परिणामी कामे वेळेत पूर्ण होत नाही. क्षमता नसलेल्या संस्थेला, ठेकेदाराला काम देऊन त्याचा दर्जाही जोपासला जात नाही. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.यवतमाळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील विहिरींच्या साफसफाई व दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध केली. यामध्ये जाणीवपूर्वक जाचक अटी लावल्या आहे. एकीकडे बांधकाम व नगरपरिषदेत नोंदणी असलेल्या ठेकेदाराला काम घेता येणार नाही, तर दुसरीकडे साधे प्लंबिंगचे काम करणाºया व्यक्तीला संधी दिली आहे.इतकेच नव्हे तर किती विहिरी दुरुस्त करावयाच्या आहे, त्याचे बजेट काय याचाही उल्लेख केलेला नाही. काम घेणाºया संस्था व ठेकेदारांकडे आर्थिक ऐपतीची मागणीसुद्धा केलेली नाही. शहरातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता ही निविदा प्रक्रिया सुटसुटीत पद्धतीने करणे आवश्यक होते. त्यासाठी ढोबळमानाने अत्यावश्यक असलेल्या अटी ठेवणे अपेक्षित होते. मात्र कुणी निविदेला पात्रच ठरू नये अशा काही अटींचा यात समावेश केला आहे.बाभूळगाव नगरपंचायतीने तर सिमेंट रस्ता बांधकामासाठी तब्बल ५८ अटी लादल्या आहेत. घाटंजी नगरपरिषदेने स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण व गार्डनिंगच्या कामात हॉटमिक्स प्लाँटची अट घातलेली आहे. यावरून पालिकास्तरावरील कामे वेळेत पूर्ण होत नाही.काम मिळविण्यासाठी ४० टक्के खर्चठेकेदारांचा निविदा प्रक्रियेला प्रतिसाद नसल्याचे चित्र निर्माण करून पालिकेतील प्रशासकीय यंत्रणा हितसंबंध असलेल्या ठेकेदारांच्या घशात कामे घालतात. हा प्रकार पूर्वीच्या निविदा प्रक्रियेपेक्षाही घातक ठरत आहे. काम घेणाऱ्या कंत्राटदाराला काम मिळविण्यासाठीच ४० टक्के रक्कम खर्च करावी लागते. उरलेल्या ६० टक्क्यात प्रत्यक्ष काम केले जाते. यावरून त्या कामाचा काय दर्जा जोपासला जात असेल याची कल्पनाच न केलेली बरी. या प्रकाराबाबत कुणीही बोलायला मात्र तयार नाही.