शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ई-क्लास जमिनीवरील जंगल वनविभागाच्या ताब्यात

By admin | Updated: March 6, 2017 01:19 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महसूल विभागाच्या ‘ई क्लास‘ जागेत घनदाट जंगल पसरले आहे. हे जंगल वनविभागाच्या ताब्यात घेण्याची हालचाल सुरू झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव : वृक्षतोडीला बसणार चाप यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महसूल विभागाच्या ‘ई क्लास‘ जागेत घनदाट जंगल पसरले आहे. हे जंगल वनविभागाच्या ताब्यात घेण्याची हालचाल सुरू झाली आहे.आत्तापर्यंत हे जंगल वनविभागाच्या कार्यकक्षेत येत नसल्याची सबब पुढे करून स्थानिक वनाधिकारी, कर्मचारी कारवाई टाळत होते. यातून खासगी सर्व्हेनंबरमध्ये वृक्षतोडीची परवानगी काढून ई-क्लासचे जंगल साफ केले जाते. हा प्रकार टाळण्यासाठी आता हे जंगल वनविभागाच्या कार्यकक्षेत घेण्याची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर ई-क्लास जागेवर जंगल पसरलेले आहे. या जंगलात अनेक मौल्यवान वृक्ष आहेत. मात्र हे जंगल वनविभागाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचा कांगावा करून बरेचदा स्थानिक वनाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. जंगल तोडीच्या तक्रारी नंतर तेथील तलाठ्यांकडून कारवाई होत होती. तथापि वृक्ष तोडीनंतरच्या कारवाईबाबत तांत्रिक माहिती नसल्याने समस्या निर्माण होत होत्या. शिवाय घटनास्थळ पंचनामे, यात तफावत आल्याने सागवान ठेकेदारांचे फावत होते. तक्रारी होऊनही कारवाई शून्य होती. ई-क्लास जंगलाला लागून असलेल्या खासगी सर्व्हेनंबरमध्ये वृक्ष तोडण्याची परवानगी घेऊन जंगलातून कटाई केली जात होती. जबाबदार यंत्रणाच नसल्याने तस्कारांचे फावत होते. हे प्रकार थांबविण्यासाठी आता स्थानिक वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी) आरक्षितचा दर्जा देणारई-क्लास जंगलाला आरक्षित जंगलाचा दर्जा दिला जाणार आहे. तसा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील मोठी वनसंपदा कायम राखणे सोपे होणार आहे.