शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

ई-बँकिंग सेवा शुभारंभावरच थांबली

By admin | Updated: December 2, 2014 23:14 IST

नागरिकांना गावातच बँक सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने सुरू करण्यात आलेली ई-बँकींग (आर्थिक समावेशन) सेवा राळेगाव तालुक्यात शुभारंभावरच थांबली आहे. या तालुक्यात १७ ठिकाणी ही सेवा दिली जाणार होती.

के.एस. वर्मा - राळेगावनागरिकांना गावातच बँक सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने सुरू करण्यात आलेली ई-बँकींग (आर्थिक समावेशन) सेवा राळेगाव तालुक्यात शुभारंभावरच थांबली आहे. या तालुक्यात १७ ठिकाणी ही सेवा दिली जाणार होती. परंतु गेली दहा महिन्यात केवळ एका ठिकाणी या सेवेला सुरुवात झाली. जिल्ह्यासाठीही ठेवण्यात आलेले लक्ष्य पार करणे तर दूर जवळपासही पोहोचले नाही. ग्रामपंचायतींचे हे अपयश मानले जात आहे. राळेगाव मतदारसंघातील परसोडी (ता.कळंब) येथे तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी १० फेब्रुवारी रोजी ई-बँकिंग या राज्यस्तरीय सेवेचा शुभारंभ केला होता. राळेगाव तालुक्यातील एकूण १७ गावांना या सेवेचा लाभ लवकरच मिळेल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. आज दहा महिने संपल्यानंतर केवळ वनोजा या एकमेव गावात सेंट्रल बँक वाढोणाबाजार शाखा या राष्ट्रीयकृत बँकेने लिंक उपलब्ध करून दिली. इतर ठिकाणी बँकांकडून लिंक उपलब्ध करून दिली नसल्याने या सेवेचा परिसराच्या ग्रामीण लोकांना लाभ मिळू शकलेला नाही. यवतमाळ जिल्ह्यात या सेवेंतर्गत २०० गावे जोडले जातील, असे यावेळी ग्रामीण विकासमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यात ही योजना अपेक्षित परिणाम देवू शकलेली नाही. ती का अयशस्वी झाली, त्यास दोषी कोण आदी बाबतचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे. निदान आता तरी ही सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी आहे.ग्रामविकास विभागाने महाआॅनलाईन केंद्र शासन मान्यता प्राप्त सीएससी, एसपीव्ही या कंपनीशी करार केला होता. या कंपनीने देशातील राष्ट्रीयकृत बँकांशी करार केला. टप्प्या टप्प्याने बँक शाखा नसलेल्या राज्यातील सर्व आॅनलाईन ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यामुळे नागरिकांना बँक सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होणार होती. गावाबाहेर जावून पैसा, श्रम आणि वेळ खर्च करण्याची झंझट टळणार होती. बँकच गावात येणार असल्याने मोठी सुविधा प्राप्त होईल, अशी प्रसिद्धी त्यावेळी करण्यात आली होती.या सेवेद्वारे ग्रामस्थांचे खाते उघडणे, रक्कम भरणे, काढणे, ड्राफ्ट बनविणे, रक्कम हस्तांतरित करणे, कर्ज प्रस्ताव तयार करणे, लाभार्थ्यांना शासनाचे थेट अनुदान वितरित करणे आदी प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. संग्राम कक्षामार्फत वीज बिल, फोन बिल, मोबाईल देयक भरणे, रेल्वे व बसचे आरक्षण करणे, मोबाईल रिचार्ज करणे यासारखी बहुद्देशीय कामे सदर योजनेंतर्गत केली जाणार होती. यासाठी विविध प्रकारची पदे ग्राम ते जिल्हा आणि राज्यस्तरावर निर्माण करून ती भरण्यात आली. कामे सुरू झाली मात्र अंतिम परिणाम आजपर्यंत मिळालेले नाही.