शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

ई-बँकिंग सेवा शुभारंभावरच थांबली

By admin | Updated: December 2, 2014 23:14 IST

नागरिकांना गावातच बँक सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने सुरू करण्यात आलेली ई-बँकींग (आर्थिक समावेशन) सेवा राळेगाव तालुक्यात शुभारंभावरच थांबली आहे. या तालुक्यात १७ ठिकाणी ही सेवा दिली जाणार होती.

के.एस. वर्मा - राळेगावनागरिकांना गावातच बँक सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने सुरू करण्यात आलेली ई-बँकींग (आर्थिक समावेशन) सेवा राळेगाव तालुक्यात शुभारंभावरच थांबली आहे. या तालुक्यात १७ ठिकाणी ही सेवा दिली जाणार होती. परंतु गेली दहा महिन्यात केवळ एका ठिकाणी या सेवेला सुरुवात झाली. जिल्ह्यासाठीही ठेवण्यात आलेले लक्ष्य पार करणे तर दूर जवळपासही पोहोचले नाही. ग्रामपंचायतींचे हे अपयश मानले जात आहे. राळेगाव मतदारसंघातील परसोडी (ता.कळंब) येथे तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी १० फेब्रुवारी रोजी ई-बँकिंग या राज्यस्तरीय सेवेचा शुभारंभ केला होता. राळेगाव तालुक्यातील एकूण १७ गावांना या सेवेचा लाभ लवकरच मिळेल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. आज दहा महिने संपल्यानंतर केवळ वनोजा या एकमेव गावात सेंट्रल बँक वाढोणाबाजार शाखा या राष्ट्रीयकृत बँकेने लिंक उपलब्ध करून दिली. इतर ठिकाणी बँकांकडून लिंक उपलब्ध करून दिली नसल्याने या सेवेचा परिसराच्या ग्रामीण लोकांना लाभ मिळू शकलेला नाही. यवतमाळ जिल्ह्यात या सेवेंतर्गत २०० गावे जोडले जातील, असे यावेळी ग्रामीण विकासमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यात ही योजना अपेक्षित परिणाम देवू शकलेली नाही. ती का अयशस्वी झाली, त्यास दोषी कोण आदी बाबतचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे. निदान आता तरी ही सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी आहे.ग्रामविकास विभागाने महाआॅनलाईन केंद्र शासन मान्यता प्राप्त सीएससी, एसपीव्ही या कंपनीशी करार केला होता. या कंपनीने देशातील राष्ट्रीयकृत बँकांशी करार केला. टप्प्या टप्प्याने बँक शाखा नसलेल्या राज्यातील सर्व आॅनलाईन ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यामुळे नागरिकांना बँक सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होणार होती. गावाबाहेर जावून पैसा, श्रम आणि वेळ खर्च करण्याची झंझट टळणार होती. बँकच गावात येणार असल्याने मोठी सुविधा प्राप्त होईल, अशी प्रसिद्धी त्यावेळी करण्यात आली होती.या सेवेद्वारे ग्रामस्थांचे खाते उघडणे, रक्कम भरणे, काढणे, ड्राफ्ट बनविणे, रक्कम हस्तांतरित करणे, कर्ज प्रस्ताव तयार करणे, लाभार्थ्यांना शासनाचे थेट अनुदान वितरित करणे आदी प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. संग्राम कक्षामार्फत वीज बिल, फोन बिल, मोबाईल देयक भरणे, रेल्वे व बसचे आरक्षण करणे, मोबाईल रिचार्ज करणे यासारखी बहुद्देशीय कामे सदर योजनेंतर्गत केली जाणार होती. यासाठी विविध प्रकारची पदे ग्राम ते जिल्हा आणि राज्यस्तरावर निर्माण करून ती भरण्यात आली. कामे सुरू झाली मात्र अंतिम परिणाम आजपर्यंत मिळालेले नाही.