शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दत्त चौकातील भाजी मंडीत युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:32 IST

गजबजलेल्या दत्त चौकातील भाजी मंडीच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता १९ वर्षीय युवकाचा सात जणांनी धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेने यवतमाळातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

ठळक मुद्देशस्त्राचे १३ वार : बारावीचा विद्यार्थी, तीन मारेकऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गजबजलेल्या दत्त चौकातील भाजी मंडीच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता १९ वर्षीय युवकाचा सात जणांनी धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेने यवतमाळातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.क्षितीज राजेश भगत (१९) असे मृताचे नाव असून तो सुराणा ले-आऊट, अंबिकानगर पाटीपुरा यवतमाळ येथील रहिवासी आहे. क्षितीज हा धामणगाव रोड स्थित जाजू महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. भाजी मंडीच्या प्रवेशद्वारावर सात जणांनी त्याला गाठले व काही एक कळण्याच्या आत त्याच्या पोटावर, पाठीवर व बगलेत चाकूचे सपासप १३ वार केले. क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेने भाजी मंडी परिसरात खळबळ निर्माण झाली. अवधूतवाडी पोलिसांना लगेच पाचारण करण्यात आले. क्षितीजला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला क्षितीजची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर घटनास्थळी सापडलेल्या त्याच्या मोबाईलवरून संपर्क करून त्याची ओळख पटविण्यात आली.मृत क्षितीजची बहीण स्वाती हिच्या फिर्यादीवरून गोलू उर्फ प्रणव राजू मेश्राम, सिनू उर्फ राहूल उर्फ सिनू संजय शिंदे, आकाश वाढई तिन्ही रा. अंबिकानगर, देवा, अरविंद भिमकुंड दोन्ही रा. घाटंजी, प्रसन्न उर्फ दाऊ प्रमोद मेश्राम रा. सेजल रेसीडेन्स, सत्यम डोंगरे या सात जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात भादंवि १४७, १४८, १४९, ३०२, १२० ब कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. खुनामागील नेमके कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी महादेव मंदिर भागातून एकाला ताब्यात घेतले. त्यातूनच आरोपी हे दाऊच्या आजीकडे आर्णीत लपून असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा करण्यासाठी टोळी विरोधी पोलीस पथकाचे उपनिरीक्षक संतोष मनवर आपल्या सहकाऱ्यांसह पाठोपाठ आर्णीत पोहोचले. तेथे गोलू व त्याचे साथीदार शिवाजी चौकातील एका घरात दडून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या घराला वेढा घातला. यावेळी आरोपीने अचानक मनवर यांच्यावर चाकूहल्ला केला. तर मनवर यांनीही आरोपीच्या दिशेने लगेच गोळी झाडली. ही गोळी गोलूच्या डाव्या मांडीवर लागली. त्यात तो जखमी झाला. यावेळी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात भादंवि ३०७, ३५३, ३३२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रानुसार, गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास क्षितीज व आरोपी गोलू आणि साथीदारांचे नालंदा चौकात भांडण झाले. याच भांडणाचा वचपा म्हणून क्षितीजचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला. क्षितीज हा कुटुंबात एकटाच होता. त्याला तीन बहिणी आहेत. त्याचे आई-वडील रोजमजुरीचे काम करतात. क्षितीजच्या खुनामागील नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस विविध पैलूंनी या गुन्ह्याचा तपास करीत आहे.बघा, गुंडांची हिंमत केवढी वाढली, पोलिसांवर चौथा हल्लाराजकीय आशीर्वादाने चालणारी यवतमाळ शहरातील गुन्हेगारी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. ते आता पोलिसांवर हल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नसल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी क्षितीज भगतच्या खुनातील आरोपीला पकडण्यासाठी आर्णीत गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांच्यावर आरोपी गोलू मेश्राम व साथीदारांनी चाकूहल्ला केला. सावध असलेल्या मनवर यांनी लगेच आपल्या सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून गोलूच्या दिशेने गोळी झाडली. ती त्याच्या पायाला लागली. यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात फौजदार संतोष मनवर यांचा बराच दबदबा आहे. मात्र त्यांच्यावरही खुनातील आरोपी हल्ला करीत असतील तर अन्य सामान्य पोलीस कर्मचाºयांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. विविध गुन्ह्यातील तपासाच्या निमित्ताने एसपींच्या सतत संपर्कात राहणाऱ्या अ‍ॅन्टी गँग सेलमधील उपनिरीक्षकावरच गुंड हल्ला करू शकतात तर ग्रामीण भागातील पोलिसांची अवस्था काय असेल याची कल्पना येते.

टॅग्स :Murderखून