शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

स्मार्ट कार्ड नोंदणीत लिंक फेलचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:38 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप सहन करत थांबावे लागत आहे.

ठळक मुद्देज्येष्ठांचे हाल : सेतूमध्ये आकारले जात आहे १०० रूपयांचे शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप सहन करत थांबावे लागत आहे.१३ जूनला ही योजना कार्यान्वीत झाल्यानंतर १४ जूनच्या सकाळपासून वणीच्या आगारात स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठांची प्रचंड गर्दी उसळली. ती आजही कायम आहे. यासाठी वणीच्या एस.टी.आगारात एका टेबलवर केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने या कर्मचाºयावर नोंदणीसाठी प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे नोंदणीसाठी बराच विलंबही होत असल्याचे ज्येष्ठांचे म्हणणे आहे. याठिकाणी आणखी दोन टेबल सुरू केल्यास कामाचा खोळंबा होणार नाही. असे असले तरी अद्याप वणी आगाराकडून त्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. अलिकडेच वणीतील दोन सेतू केंद्रांनादेखील स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी ज्येष्ठांकडून ७० रूपये घ्यावे, असे आदेश असताना या सेतूंमधून १०० रूपये घेतले जात असल्याचा ज्येष्ठांचा आरोप आहे. ही लुट थांबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.वणी आगारात आतापर्यंत एक हजार ४४७ स्मार्ट कार्ड तयार झाले आहे. मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी ते अद्यापही नेलेले नाहीत. त्यामुळे आगाराला हे कार्ड सांभाळून ठेवावे लागत आहे. त्यातच गेल्या पाच-सहा दिवसांपासून वणी एस.टी.आगारात लिंक फेलची समस्या गंभीर बनली आहे. ही समस्या सुटल्यास दररोज ६० ते ७० कार्ड बनविले जाऊ शकतात. सकाळपासून नोंदणीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लिंक फेल झाल्याचे कळताच तासनतास एस.टी.आगाराच्या कार्यालयासमोर ताटकळत राहावे लागते.मोबाईलची समस्यास्मार्ट कार्ड नोंदणीसाठी येणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांजवळ स्वत:चा आधुनिक मोबाईलच नसतो. नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवर ओटीपी नंबर येतो. तो नंबर सांगितल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र अनेकांजवळ मोबाईलच नसल्याने नोंदणीत बाधा येत आहे.