शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

संमेलनात प्रती ‘नयनतारा’ पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:37 IST

ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा वाद सुरू असतानाच शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रती ‘नयनतारां’ना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे या सोहळ्यालाही डाग लागला.

ठळक मुद्देउद्घाटनात कोलाहलसहगल यांचे भाषण वाटले, मुखवटेही घातले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : दरवेळी अध्यक्षाच्या निवडीवरून गाजणारे साहित्य संमेलन यंदा उद्घाटकाच्या नावावरून वादग्रस्त ठरले. ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा वाद सुरू असतानाच शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रती ‘नयनतारां’ना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे या सोहळ्यालाही डाग लागला.९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी यवतमाळात उद्घाटन झाले. या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष तथा यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचे भाषण सुरू असतानाच प्रेक्षकांमधून गोंगाट सुरू झाला. त्यावेळी तीन महिला नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आढळल्या. त्यांना पोलिसांनी तडकाफडकी ताब्यात घेतले. उद्घाटन कार्यक्रम संपेपर्यंत त्यांना कुणाशीही बोलू देण्यात आले नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही त्यांचे छायाचित्र घेण्यास किंवा चित्रीकरण करण्यास पोलिसांनी मज्जाव केला. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत या महिलांना रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीस वाहनात बसवून ठेवण्यात आले होते.रत्नागिरीच्या रश्मी कशाळकर, गोव्यातून आलेल्या डॉ. अनुजा जोशी व आणखी एका महिलेचा यात समावेश होता. त्यांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केलेली नव्हती. मात्र निमंत्रण रद्द झालेल्या उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या छापील भाषणांच्या तीन हजार प्रती त्यांनी रसिकांमध्ये वाटल्या. तसेच कार्यक्रम सुरू असताना त्या केवळ सहगल यांचा मुखवटा घालून मूक निषेध नोंदवित होत्या. परंतु, आजूबाजूच्या प्रेक्षकांनी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहिले आणि कोलाहल सुरू झाला. त्यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या तिन्ही महिला चांगल्या लेखिका असून दरवर्षीच्या संमेलनाला त्या उपस्थित राहतात, असे त्यांच्या परिचितांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन