शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

एकट्याने खोदली विहीर, पण वीज मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:00 IST

आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे.

ठळक मुद्देविद्युत विभागाची अनागोंदी : जवळा येथील मेहनती कास्तकाराची व्यवस्थेकडून थट्टा

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे. डिमांड भरूनही विद्युत विभाग काही वीज द्यायला तयार नाही. जशी स्वत:च विहीर खणली, तशी स्वत:च वीज निर्मिती करावी का, गंभीर प्रश्न या शेतकºयापुढे निर्माण झाला आहे.तालुक्यातील जवळा गावातील हा गंभीर प्रश्न आहे. येथील पांडुरंग अर्जुन पारधी (६०) हा शेतकरी म्हणजे मेहनतीची मिसाल. १ मे १९७५ रोजी गुरुदेव सेवा मंडळाने जवळा येथे दादासाहेब सोळंके यांच्या नेतृत्वात विवाह मेळावा घेतला. त्यातच पांडुरंगचेही लग्न झाले. तो क्षण त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. आयोजकांनी ११ बक्षीसे ठेवली होती. यातील सर्वात मोठे बक्षीस पांडुरंगला मिळाले. चक्क सहा एकर शेतीची चिठ्ठी पांडुरंगच्या नावाची निघाली! मग काय! पांडुरंगच्या आनंदाला पारावार उरला नाही. या शेतीवरच त्याने आपल्या तीन मुलींचेही लग्न केले. आता आपल्या शेतात ओलिताची सोय असावी, असे हिरवे स्वप्न त्याला खुणावू लागले. त्याने विचार केला, आपल्या शेतात आपणच विहीर खोदली तर..!झाले, तो कामी लागला. त्याने स्वत:च विहिरीसाठी खोदकाम सुरू केले. त्याच्याकडे पाहून काही लोक टीका करू लागले. पण तो अखंड खोदतच राहिला. तीन वर्षात विहीर पूर्ण केली. आता पाहिजे वीज. त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला गणेश मोरे यांनीही मदत केली. पण पांडुरंगचा अर्जच गहाळ केला. तरीही तो निराश झाला नाही. चौर्थ्यांदा अर्ज केला. तेव्हा कुठे विद्युत विभागाने त्याला डिमांड दिली. ती त्याने २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरली. डिमांड भरून आता वर्ष उलटले. तरीही वीज जोडणी काही मिळालेली नाही.पायपीट सुरूचपांडुरंगची पायपीट काही संपलेली नाही. तो स्वत: आमदार ख्वाजा बेग यांना भेटला. त्यांनी अधिकाºयांना त्वरित वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. यानंतरही वीज जोडणी देण्यात आलेली नाही, हे विशेष. तर दुसरीकडे याबाबत विद्युत कार्यालयात चौकशी केली असता, मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व शेतकºयांना वीज जोडणी देण्यात आली, असा दावा करण्यात आला.