शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

एकट्याने खोदली विहीर, पण वीज मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:00 IST

आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे.

ठळक मुद्देविद्युत विभागाची अनागोंदी : जवळा येथील मेहनती कास्तकाराची व्यवस्थेकडून थट्टा

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे. डिमांड भरूनही विद्युत विभाग काही वीज द्यायला तयार नाही. जशी स्वत:च विहीर खणली, तशी स्वत:च वीज निर्मिती करावी का, गंभीर प्रश्न या शेतकºयापुढे निर्माण झाला आहे.तालुक्यातील जवळा गावातील हा गंभीर प्रश्न आहे. येथील पांडुरंग अर्जुन पारधी (६०) हा शेतकरी म्हणजे मेहनतीची मिसाल. १ मे १९७५ रोजी गुरुदेव सेवा मंडळाने जवळा येथे दादासाहेब सोळंके यांच्या नेतृत्वात विवाह मेळावा घेतला. त्यातच पांडुरंगचेही लग्न झाले. तो क्षण त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. आयोजकांनी ११ बक्षीसे ठेवली होती. यातील सर्वात मोठे बक्षीस पांडुरंगला मिळाले. चक्क सहा एकर शेतीची चिठ्ठी पांडुरंगच्या नावाची निघाली! मग काय! पांडुरंगच्या आनंदाला पारावार उरला नाही. या शेतीवरच त्याने आपल्या तीन मुलींचेही लग्न केले. आता आपल्या शेतात ओलिताची सोय असावी, असे हिरवे स्वप्न त्याला खुणावू लागले. त्याने विचार केला, आपल्या शेतात आपणच विहीर खोदली तर..!झाले, तो कामी लागला. त्याने स्वत:च विहिरीसाठी खोदकाम सुरू केले. त्याच्याकडे पाहून काही लोक टीका करू लागले. पण तो अखंड खोदतच राहिला. तीन वर्षात विहीर पूर्ण केली. आता पाहिजे वीज. त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला गणेश मोरे यांनीही मदत केली. पण पांडुरंगचा अर्जच गहाळ केला. तरीही तो निराश झाला नाही. चौर्थ्यांदा अर्ज केला. तेव्हा कुठे विद्युत विभागाने त्याला डिमांड दिली. ती त्याने २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरली. डिमांड भरून आता वर्ष उलटले. तरीही वीज जोडणी काही मिळालेली नाही.पायपीट सुरूचपांडुरंगची पायपीट काही संपलेली नाही. तो स्वत: आमदार ख्वाजा बेग यांना भेटला. त्यांनी अधिकाºयांना त्वरित वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. यानंतरही वीज जोडणी देण्यात आलेली नाही, हे विशेष. तर दुसरीकडे याबाबत विद्युत कार्यालयात चौकशी केली असता, मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व शेतकºयांना वीज जोडणी देण्यात आली, असा दावा करण्यात आला.