शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

एकट्याने खोदली विहीर, पण वीज मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:00 IST

आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे.

ठळक मुद्देविद्युत विभागाची अनागोंदी : जवळा येथील मेहनती कास्तकाराची व्यवस्थेकडून थट्टा

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे. डिमांड भरूनही विद्युत विभाग काही वीज द्यायला तयार नाही. जशी स्वत:च विहीर खणली, तशी स्वत:च वीज निर्मिती करावी का, गंभीर प्रश्न या शेतकºयापुढे निर्माण झाला आहे.तालुक्यातील जवळा गावातील हा गंभीर प्रश्न आहे. येथील पांडुरंग अर्जुन पारधी (६०) हा शेतकरी म्हणजे मेहनतीची मिसाल. १ मे १९७५ रोजी गुरुदेव सेवा मंडळाने जवळा येथे दादासाहेब सोळंके यांच्या नेतृत्वात विवाह मेळावा घेतला. त्यातच पांडुरंगचेही लग्न झाले. तो क्षण त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. आयोजकांनी ११ बक्षीसे ठेवली होती. यातील सर्वात मोठे बक्षीस पांडुरंगला मिळाले. चक्क सहा एकर शेतीची चिठ्ठी पांडुरंगच्या नावाची निघाली! मग काय! पांडुरंगच्या आनंदाला पारावार उरला नाही. या शेतीवरच त्याने आपल्या तीन मुलींचेही लग्न केले. आता आपल्या शेतात ओलिताची सोय असावी, असे हिरवे स्वप्न त्याला खुणावू लागले. त्याने विचार केला, आपल्या शेतात आपणच विहीर खोदली तर..!झाले, तो कामी लागला. त्याने स्वत:च विहिरीसाठी खोदकाम सुरू केले. त्याच्याकडे पाहून काही लोक टीका करू लागले. पण तो अखंड खोदतच राहिला. तीन वर्षात विहीर पूर्ण केली. आता पाहिजे वीज. त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला गणेश मोरे यांनीही मदत केली. पण पांडुरंगचा अर्जच गहाळ केला. तरीही तो निराश झाला नाही. चौर्थ्यांदा अर्ज केला. तेव्हा कुठे विद्युत विभागाने त्याला डिमांड दिली. ती त्याने २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरली. डिमांड भरून आता वर्ष उलटले. तरीही वीज जोडणी काही मिळालेली नाही.पायपीट सुरूचपांडुरंगची पायपीट काही संपलेली नाही. तो स्वत: आमदार ख्वाजा बेग यांना भेटला. त्यांनी अधिकाºयांना त्वरित वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. यानंतरही वीज जोडणी देण्यात आलेली नाही, हे विशेष. तर दुसरीकडे याबाबत विद्युत कार्यालयात चौकशी केली असता, मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व शेतकºयांना वीज जोडणी देण्यात आली, असा दावा करण्यात आला.