शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

पावसाअभावी खरीप पेरण्या धोक्यात

By admin | Updated: June 15, 2017 01:04 IST

वणीसह मारेगाव व झरी तालुक्यात जवळपास ३० टक्के पेरणी आटोपली. बिजांकूरही फुटले.

सरासरी ३० टक्के पेरण्या आटोपल्या : शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणीसह मारेगाव व झरी तालुक्यात जवळपास ३० टक्के पेरणी आटोपली. बिजांकूरही फुटले. मात्र या पिकाला आवश्यक असलेला पाऊसच आतापर्यंत झाला नाही. त्यात कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, २२ जूनपर्यंत चांगला पाऊसच नसल्याने या पेरण्या धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास बियाणे मातीतच करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा मान्सून लवकर येण्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्याच्या सुरूवातीलाच चांगला पाऊस बरसेल, असा अंदाजही बांधण्यात आला होता. विशेष म्हणजे कधी नव्हे तो मेच्या अखेरच्या आठवड्यात रोहीणी नक्षत्र प्रारंभ होताच, वणी, झरी, मारेगाव तालुक्यात सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरेल, असा भ्रम करून वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कपाशीची टोबणी केली. सध्यस्थितीत या तिनही तालुक्यात सरासरी ३० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून वणी व मारेगाव तालुक्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. कपाशीच्या बियाणांची टोबणी केल्यानंतर आता बियाणे अंकूरले देखील आहेत. येत्या दोन तीन दिवसांत कपाशीला पावसाची गरज आहे. मात्र हवामान खात्याचा संदर्भ देत २२ जूनपर्यंत दमदार पावसाची शक्यता नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी (पंचायत) यांनी ‘लोकमत’ला दिली. गेल्या काही वर्षांत मृग नक्षत्रात अल्प पाऊस पडत आहे. त्यामुळे पेरण्यांचा खोळंबा होण्याचा प्रकार दरवर्षीच घडतो. यंदा मात्र मे महिन्याच्या २४ तारखेला सुरू झालेल्या रोहिणी नक्षत्रातच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी लवकर पावसाला प्रारंभ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. हवामान खात्याचाही तसाच अंदाज होता. परंतु अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीनंतर पाऊस बेपत्ता झाला. सायंकाळच्यावेळी ढगाळ वातावरण तयार होत असले तरी पाऊस मात्र बरसत नाही, अशीच स्थिती आहे. दमदार अवकाळी पावसानंतर मॉन्सूनचा पाऊस लवकर सुरू होईल, अशी आशा शेतकऱ्यांनाही वाटत होती. मात्र जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला असला तरी हवा तसा पाऊस अद्याप झाला नाही. मात्र अवकाळी पावसाच्या भरवशावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, ते शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेरणीसाठी हवा सलग ७० मि.मी.पाऊस पिकांच्या पेरणीसाठी सलग ७० मि.मी.पावसाची गरज आहे. वणी तालुक्यात १ जूनपासून आतापर्यंत ५० मि.मी.पाऊस झाला, तर मारेगावात ८८ मि.मी.पाऊस झाला. झरी तालुक्यात ७७ मि.मी.पाऊस झाला. हा खंडीत पाऊस आहे. जोपर्यंत सलग ७० मि.मी.पाऊस होत नाही तोपर्यंत जमिनीची धूप जात नाही. सध्या मुंबईत जोवर संततधार पाऊस सुरू होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं मॉन्सून राज्यात सक्रीय होत नाही. त्यामुळे सलग ७० मि.मी.पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी युवराज जंगले यांनी केले आहे.