शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पुसदमध्ये दुबार पेरणीचे सावट

By admin | Updated: July 17, 2015 02:30 IST

तालुक्यात जवळजवळ ९० टक्के पेरणी झाली असून गत २३ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकरी चिंताग्रस्त : सोयाबीन, कपाशी, तूर उद्धवस्तपुसद : तालुक्यात जवळजवळ ९० टक्के पेरणी झाली असून गत २३ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांश शेतातील पिके उन्हामुळे करपली असून दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी कर्ज, उसनवार घेऊन बी-बियाणे व खताची खरेदी केली होती. जून महिन्यात पेरणीलायक पाऊस पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीला सुरुवात केली. पाऊस नसल्यामुळे पेरणी उलटली आहे. तर निघालेली कोवळी पिके वन्यप्राणी फस्त करत आहेत. तर काहींची करपली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचे मोठे संकट कायम आहे. पिके पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. अवेळी येणारा पाऊस तसेच नैसर्गिक कारणांमुळे हतबल शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होत असल्याने खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी सरासरी पाऊस कमी पडल्याने तालुक्यात माळरानावर अद्यापही मुबलक हिरवा चारा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पाऊस न पडल्यास पशुपालकांना चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शेतीच्या बांधावर ही चारा उगवला नाही. त्यामुळे पशुपालक चिंतेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लागवड झालेली पिके सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आदी पिके धोक्यात आहे. आता पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच असून पावसाच्या प्रतीक्षेत जीव टांगणीला लागला आहे.अनेक शेतकरी आता शेतात जाण्यासही टाळत आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर शेतात नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. दुबार पेरणीची चिंता शेतकऱ्यांना लागली असून बियाण्यासाठी पैशाची तजवीज कशी करावी, या विवंचनेत तालुक्यातील शेतकरी दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पाऊस पडावा, यासाठी गावागावात धार्मिक कार्यक्रम, जलाभिषेक, सप्ताह, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थानावर दररोज भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहे. तसेच धोंडी काढूनही वरुणराजाला विनवनी केली जात आहे.