शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांमुळे आगाराचे तीनतेरा

By admin | Updated: June 11, 2014 00:18 IST

एसटीला महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हटल्या जाते. दिवसेंदिवस खासगी गाड्यांची संख्या वाढत आहे. ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूकही केल्या जाते. परंतु आजही हजारो लोक एसटीतूनच प्रवास करतात.

मुकेश इंगोले - दारव्हाएसटीला महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हटल्या जाते. दिवसेंदिवस खासगी गाड्यांची संख्या वाढत आहे. ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूकही केल्या जाते. परंतु आजही हजारो लोक एसटीतूनच प्रवास करतात. दारव्हा तालुक्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही पण सध्या या आगाराची अवस्था बघता प्रवाशी एसटीचा द्वेष करू लागतील की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि याला कारणीभूत ठरलाय तो अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा. आगार व्यवस्थापकाचे कोणत्याही बाबीवर नियंत्रण नाही, अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष असल्यामुळेच दारव्हा आगाराची दुरावस्था असल्याचा आरोप होत आहे. बसगाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. कोणतीही बस वेळेवर सुटत नाही. प्रवाशांना बसस्थानकावर तासनतास बसावे लागते. त्यामुळे प्रचंड त्रास होतो. उत्पन्नात भर होईल, यासाठी प्रयत्न केले जात नाही. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर भर दिला जात नाही. या व इतर कारणांमुळे आगार आर्थिक तोट्यात आल्याची माहिती आहे. शहरातील अतिशय मोक्याच्या व प्रशस्त जागेवर हे आगार आहे. एसटी महामंडळाने याठिकाणी चांगल्या इमारतीसह सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. परंतु याचा चांगला उपयोग अधिकारी, कर्मचाऱ्यांना करून घेता येत नाही. या आगारात एकूण ४६ बसेस आहेत. या बसेससाठी तालुक्यातील गावे, माध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्या असे वेळापत्रक ठरवून चांगला व्यवसाय करण्यासोबत प्रवाशांना चांगली सेवा देता येऊ शकते. मात्र अधिकाऱ्यांकडून त्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. या आगारातून मध्यम पल्ल्याच्या नांदेड, शेगाव, अकोला व लांब पल्ल्याच्या धुळे, बुलढाणा, बीड, जळगाव आदी गाड्या धावत असल्याचे सांगितले जाते. परंतु चांगला व्यवसाय देणाऱ्या बीड व बुलढाणा या गाड्या वारंवार रद्द केल्या जातात. एवढेच नव्हे तर रस्ता असतानासुद्धा तालुक्यातील पूर्ण गावांमध्ये एसटी बस पोहचत नाही. गोंडेगाव टाकळी, उचेगाव, निंभा, किन्हीवळगी, उजोना यासह काही गावांमध्ये बससेवा नाही. या गावातील नागरिकांनी खूप प्रयत्न केले. परंतु तरीही बस सुरू झाली नाही. बर आहे, त्याठिकाणीही बस वेळापत्रकानुसार सुटत नाही. त्यामुळे प्रवाश्यांना वाट पाहत बसावे लागते आर्णीकरिता दर अर्ध्या तासाने बससेवा असल्याचा दावा केला जातो. पण मोठी प्रवाशी संख्या असलेल्या याच मार्गाची अतिशय वाईट स्थिती आहे. शेकडोंच्या संख्येने प्रवासी ताटकळत बसलेले असतात. दररोज एक हजार ते दोन हजार किलोमीटरचे टायमिंग रद्द होत असल्याची माहिती आहे. ४६ पैकी अर्ध्या बसगाड्यांची स्थिती वाईट आहे. काही बसेस तर भंगारात काढायला निघाल्या तरीही रस्त्यावर धावत आहे. गाड्यांचे टायर घासल्या गेले आहे. खिडक्या तुटल्या आहे. संपूर्ण ढाचा हालत असल्याने प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अशा अवस्थेतील गाड्या चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे, असे चालक सांगतात. एवढं सगळं असूनही आगार व्यवस्थापकाचे आगाराकडे लक्ष नाही. गाड्यांची अवस्था, वेळापत्रक, प्रवाश्यांचे होणारे हाल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगार तोट्यात सुरू असताना काही सुधारणा होण्यासाठी त्यांच्याकडून पुढाकार घेतला जात नाही. अधिनस्त कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण नाही. काही प्रमुख अधिकारी अपडाऊन करतात. कार्यालयीन वेळेत थांबत नाही. या सर्व बाबींमुळे दारव्हा आगारावरही वेळ आल्याचे बोलले जाते. प्रशांत झिलपेलवार हे आगार व्यवस्थापक असताना उत्पन्नाच्या बाबतीत या आगाराचा राज्यात प्रथम क्रमांक होता. सर्व परिस्थिती तशीच आहे. फक्त आगार व्यवस्थापक बदलले त्यामुळे दारव्हा आगार तोट्यात जाण्यात काय कारण आहे, याचा उलगडा होतो.