शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

वाढत्या प्रलंबित खटल्यांमुळे न्यायही लांबतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 14:29 IST

देशातील २५ उच्च न्यायालयांमध्ये २९ जानेवारी २०२० पर्यंत ४५ लाख ८१ हजार ६१९ खटले न्यायनिवाड्याची प्रतीक्षा करीत आहेत.

ठळक मुद्देउच्च व सर्वोच्च न्यायालयदेशात ४५ लाख, तर महाराष्ट्रात पावणेतीन लाख खटले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशातील उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पक्षकारांना मिळणारा न्यायही लांबणीवर पडतो आहे. यामुळे पक्षकारांच्या पदरी प्रतीक्षा आणि निराशाच येते. स्थानिक न्यायालयांमध्येही असेच चित्र असल्याने तेथील दररोज दिसणारी गर्दी तेवढीच कायम आहे.देशातील २५ उच्च न्यायालयांमध्ये २९ जानेवारी २०२० पर्यंत ४५ लाख ८१ हजार ६१९ खटले न्यायनिवाड्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यात महाराष्ट्रातील उच्च न्यायालय व खंडपीठांचा आकडा दोन लाख ६७ एवढा आहे. यातील ७९ हजार ७४९ प्रकरणे दहा वर्षांपेक्षा जुनी आहेत. त्यात कामगार, भाडे, जमीन अधिग्रहण, सेवा, मोबदला, फौजदारी, कौटुंबीक, धार्मिक, सेवाभावी संस्था, सार्वजनिक वाद, शेती, ग्राहक आदी प्रकरणांचा समावेश आहे. न्यायदानासाठी न्यायालयांची दारे खुली असली तरी प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या व त्यामुळे विलंबाने मिळणारा न्याय ही विधी व न्याय मंत्रालयापुढील खरी चिंतेची बाब आहे. खटले प्रलंबित राहण्यामागे विविध कारणे आहेत. खटले निकाली निघावे, वेग वाढावा म्हणून विविध उपाययोजना केल्या गेल्या. परंतु प्रलंबित खटल्यांचा आकडा पाहता या उपाययोजना थिट्या पडताना दिसत आहेत. विशेष असे, सत्र व कनिष्ठ न्यायालयामधील प्रलंबित खटल्यांची संख्या वेगळीच आहे. या प्रलंबित खटल्यांचे परिणाम पक्षकारांच्या सामाजिक व वैयक्तिक जीवनावर होताना दिसतात.

विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच - रवींद्र वैद्यकैद्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘वºहाड’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र वैद्य म्हणाले, शासकीयस्तरावर अधिकारी नेमले असून त्यांना जबाबदारी व अधिकार दिले गेले आहेत. परंतु ते न्यायिक बुद्धीचा वापर करून आपल्यास्तरावर न्याय देत नाहीत, त्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळेच आज न्यायालयीन खटल्यांची संख्या वाढते आहे. क्षुल्लक बाबींसाठी जनतेला न्यायालयाचे दार ठोठावावे लागत आहे. सरकार व प्रशासनस्तरावर न्याय मिळत नसल्याचा हा पुरावा आहे. न्यायालयांच्याही मर्यादा आहेत. रातोरात न्यायालये, न्यायाधीश व पायाभूत सुविधांची संख्या वाढविणे, निर्मिती करणे शक्य होत नाही. खटले प्रलंबित राहण्यामागे कारण कोणतेही असो मात्र विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच ठरतो. प्रलंबित खटल्यांमुळे कारागृहांमधील गर्दीही प्रचंड वाढू लागली आहे. एखादा आरोपी आर्थिक परिस्थिती नसणे, वकील लावू न शकणे, पोलिसांच्या स्तरावरील हलगर्जीपणा यामुळे पाच-सात वर्षे कारागृहात राहिल्यास त्याची ती वेळ व झालेले नुकसान भरून देता येत नाही. त्याची कौटुंबिक व सामाजिक हानी होते. त्यामुळे प्रशासनाने आपल्यास्तरावरच न्याय दिल्यास न्यायालयांकडील खटल्यांची गर्दी कमी होण्यास मदत होईल.

मुलभूत हक्कांवरच गदा - अ‍ॅड. असीम सरोदेप्रख्यात विधिज्ज्ञ तथा सामाजिक न्याय विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, प्रलंबित खटले ही देशाच्या न्याय व्यवस्थेसमोरील बिकट समस्या आहे. ‘प्रत्येकाला जलदगतीने न्याय मिळेल’ या मुलभूत हक्कावरच गदा आली आहे. केवळ गंभीर गुन्हेच नव्हे तर प्रत्येकच दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा निवाडा हा ठराविक कालमर्यादेत होण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. पोलीस, वैद्यकीय अधिकारी, न्यायाधीश, सरकारी वकील, बचाव पक्षाचे वकील यांनी बांधिलकी ठेऊन व आपसात सहकार्य, संवाद ठेऊन काम करणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकांच्या मनात न्याय व्यवस्थेबाबत विश्वास असला तरी विलंब आणि आरोपींना मिळणाऱ्या फायद्याबाबत रागही आहे. न्यायाधीशांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग असलेली समिती नेमली जावी.

टॅग्स :Courtन्यायालय