शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मुंगोलीवासीयांना पुराची धास्ती

By admin | Updated: June 20, 2016 02:13 IST

पावसाळा सुरू होताच तालुक्यातील मुंगोलीवासीयांची धाकधूक सुरू झाली आहे.

पुनर्वसनाकडे दुर्लक्ष : वर्धा नदीचा वेढा गावाला पडण्याचा धोका कायम वणी : पावसाळा सुरू होताच तालुक्यातील मुंगोलीवासीयांची धाकधूक सुरू झाली आहे. यावर्षी पावसाळा जोरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने मुंगोलीवासीय अधिकच धास्तावले आहे. पाऊस जोरात पडल्यास वर्धा नदीला आलेल्या पुरात आपले गाव डुबणार तर नाही ना, ही भिती त्यांना सतावत आहे. गावकऱ्यांनी कित्येक वर्षांपासून शासनाकडे पुनर्वसनाचा तगादा लावला. मात्र निगरगट्ट वेकोलि प्रशासन त्यांच्या हाकेला साद देण्याच्या मनस्थितीत नाही.तालुक्याच्या अंतिम टोकावर वसलेले मुंगोली गाव चोहोबाजूंनी वेकोलिचे ढिगारे व वर्धा नदीच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या २० वर्षांपासून गावकरी भयभीत अवस्थेत गावात वास्तव्य करीत आहे. गावाचे पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक असतानाही वेकोलिकडून पुनर्वसनासाठी चालढकल केली जात आहे. यासाठी गावकऱ्यांनी आत्तापर्यंत प्रशासनाला व वेकोलिला अनेकदा निवेदने दिली. कित्येक आंदोलने केली. वेकोलिचे काम बंद पाडण्याचे आंदोलनसुद्धा केले. गेल्यावर्षी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मध्यस्थी करून वेकोलिला पुनर्वसन करण्यास बाध्य करण्यासाठी कसून प्रयत्न केले. त्यावेळी वेकोलिने डिसेंबर २०१५ पर्यंत मुंगोलीचे पुनर्वसन करण्याचे लेखी आश्वासनही दिले. मात्र हे आश्वासन अजूनही पाळल्या गेले नाही. वर्धा नदीच्या खोऱ्यात व वणी-कोरपना तालुक्याच्या सीमा रेषेवर असलेल्या मुंगोली गावाजवळ २० वर्षांपूर्वी सन १९९४ मध्ये खान सुरू केली. त्यासाठी तेथील ७० टक्के शेतकऱ्यांची शेती वेकोलिने विकत घेतली. मात्र उर्वरित ३० टक्के शेतकऱ्यांच्या शेती न घेतल्याने त्या शेतकऱ्यांना अद्यापही गाव सोडता आला नाही. गावापासून हाकेच्या अंतरावर कोळसा खाण असल्याने खाणीत होणाऱ्या स्फोटाचे धक्के गावाला बसतात. त्यामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले. काही घरे कोसळूनही पडली. गावाच्या उत्तरेस वेकोलिची कैलासनगर वसाहत आहे. या वसाहतीच्या शौचालयाचे घाण पाणी गावाजवळ साचते. दक्षिणेस काहीच अंतरावर वेकोलिने टाकलेले मातीचे ढिगारे व दोन बाजूंनी वर्धा नदी, असे चारही बाजूंनी गाव कचाट्यात सापडले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने वेकोलिच्या ढिगाऱ्यावरूनच मार्गक्रमण करावे लागते. स्फोटाच्या धुळीमुळे व उष्णतेमुळे शेतातील पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात या परिसरातील पैसेवारी ५० टक्केच्या आत आली होती. ग्रामपंचायतीनेही ठराव करून गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. नुकतेच यावर्षी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी या गावाला भेट देऊन पाहणी केली व वास्तव जाणून घेतले. तरी अजूनही गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळतच आहे. येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनीही या गावाचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे दिला आहे. तरीही वेकोलि मात्र अधिकाऱ्यांचे आदेशही मानायला तयार नाही. (स्थानिक प्रतिनिधी)