शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

कोरडवाहू शेतीमुळे बळीराजा त्रस्त

By admin | Updated: May 24, 2015 00:14 IST

सुपीक जमीन व पांढऱ्या सोन्याचा परिसर म्हणून वणी तालुक्याची ख्याती आहे. तथापि तालुक्यात केवळ १७ टक्केच शेती ...

१७ टक्केच सिंचन : नापिकी, कर्ज, निसर्गाची अवकृपा सदैव कायमचवणी : सुपीक जमीन व पांढऱ्या सोन्याचा परिसर म्हणून वणी तालुक्याची ख्याती आहे. तथापि तालुक्यात केवळ १७ टक्केच शेती ओलिताखाली असून उर्वरित ८३ टक्के शेती कोरडवाहू आहे. या कोरडवाहू शेतीमुळे आता बळीराजा त्रस्त झाला आहे.तालुक्यात अव्वल दर्जाचा आणि लांब धाग्याचा कापूस पिकतो. तालुक्यातील जमीन अत्यंत सुपिक आहे. मात्र सिंचनाची सुविधा तोकडी आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपले हिरवे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य नाही. तालुक्यात तब्बल ८३ टक्के शेती कोरडवाहू आहे. त्यात केवळ एकच पीक घेतले जाते. ओलिताची सोय नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. त्यामुळे ८३ टक्के शेतकरी अद्याप निसर्गाच्या भरवशावरच अवलंबून आहेत. त्यांना कोरडवाहू शेती कसावी लागत आहे.वणी तालुक्यात उद्योगांची वानवा आहे. येथील एमआयडीसी परिसर भकास पडला आहे. मोजकेच उद्योग तेथे सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील ९० टक्के जनतेची उपजिवीका शेतीवरच अवलंबून आहे़ त्यात गेल्या २५ वर्षांत तालुक्यात कोळसा खाणी आल्या. त्यांनी हजारो हेक्टर शेती संपादित केली. परिणामी शेती क्षेत्रातही घट होत आहे. प्रत्यक्षात निसर्गान्े वणी तालुक्याला मुक्तहस्ताने संपन्न केले आहे. तालुक्याला पाण्याचे वरदान लाभले आहे. वर्धा व पैनगंगा या दोन मोठ्या याच तालुक्यातून वाहतात. याशिवाय निर्गुडा व विदर्भा या दोन प्रमुख लहान नद्याही तालुक्यात आहेत. तालुक्यात लहान-मोठेही नालेही अनेक आहेत. मात्र या मोठ्या नद्या, नाल्यांचे पाणी अद्याप शेतापर्यंत पोहोचलेच नाही. धरणे, बंधारे बांधण्यात आली नाहीत. परिणामी सर्व पाणी वाहून जात आहे. त्याचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना कवडीचाही लाभ मिळत नाही. त्यांना निसर्गाच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून निसर्गही शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. एक वर्ष अतिव्ष्टी, तर दुसऱ्या वर्षी कोरडा दुष्काळ, असे दुष्टचक्र सुरू आहे.तालुक्यात ६५ हजार ५६२ हेक्टर शेती क्षेत्र आहे़ त्यापैकी केवळ ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे़ उर्वरित तब्बल ५४ हजार हेक्टर शेती कोरडवाहू आहे. यात काही शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात बोअर व ट्युबवेल खोदले आहे. मात्र अनेकांना वेळेवर वीज जोडणी मिळत नाही. परिणामी शेतात पाणी असूनही त्यांना ओलीत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना वर्षातूक केवळ एकच पीक घेता येते. सिंचन सुविधा नसल्याने तालुक्यात दिवसेंदिवस उत्पन्नात घट होत आहे. दुसरीकडे खर्च मात्र वाढत आहे. बियाणे, खत, किटकनाशके खरेदी करताना शेतकरी भांबावून जात आहे. त्यामुळे त्यांचे अंदाजपत्रक कोलमडून पडत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)निर्गुडा नदीचे खोलीकरण, बंधारे बांधणारआता निर्गुडा नदीचे खोलीकरण करून त्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यासाठी नवीन सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आदींनी त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तथापि यावर्षी आता उन्हाळा संपत आला आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे हे खोलीकरण पुढच्या वर्षांवर जाण्याचीच जादा शक्यता आहे. परिणामी बंधारेही यावर्षी पूर्णत्वास येणे अशक्य आहे. चार महिन्यांपूर्वीच त्या दृष्टीने सुरूवात करणे आवश्यक होते.बंधारे बांधण्याची गरजतालुक्यात काही वर्षांपूर्वी नदी व नाल्यांवर सहा कोल्हापुरी बंधारे बांधणात आले होते. त्यापैकी एकाही बंधाऱ्यात पाणी साठविले जात नाही़ परिणामी या बंधाऱ्यांवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे. या बंधाऱ्यांचे बरगे तर कधीच चोरीस गेले आहे. शासन या कोल्हापुरी बंधाऱ्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ते आता निरूपयोगी ठरले आहेत.