शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे बळीराजा संकटात

By admin | Updated: October 30, 2014 22:59 IST

राज्यातील राजकीय पक्षांना सरकार स्थापनेच्या चिंतेने ग्रासले असताना दुसरीकडे मात्र जगाचा पोशिंदा यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे चिंतीत झाला आहे़ भविष्यात शेती कशी करावी,

शिंदोला : राज्यातील राजकीय पक्षांना सरकार स्थापनेच्या चिंतेने ग्रासले असताना दुसरीकडे मात्र जगाचा पोशिंदा यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे चिंतीत झाला आहे़ भविष्यात शेती कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे़यंदा वणी उपविभागात बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर अल्प पाऊस पडला़ त्यामुळे ‘न भूतो न भविष्यती’ असा दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ संपूर्ण शेती हंगाम हातचा गेला आहे़ सोयाबिनच्या पिकाने पूर्णत: दगा दिला़ सोयाबिनच्या मशागतीला लागलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. ज्या ठिकाणी एका बॅगला १० ते १२ क्विंटल सोयाबीन व्हायचे, त्या ठिकाणी यावर्षी दोन, तीन क्विंटल सोयाबीन होत आहे. जवळपास कापसाचीही तीच गत आहे़ शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्च निघणेही यावर्षी कठीण झाले आहे़ त्यामुळे सालदार व मजुरांचे पैसे कोठून द्यावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे़ अपुऱ्या पावसाअभावी जमिनीत ओलावा नाही़ त्यामुळे रबी हंगामही धोक्यात सापडला आहे़ आॅक्टोबर महिन्यात एखादा पाऊस झाला असता, तर कपाशीसह रबी पिकांना लाभ झाला असता़ मात्र परतीच्या पावसासह समुद्री वादळानेही हुलकावणी दिली़ त्यामुळे रबी हंगामाची मशागत व्यर्थ जाण्याची शक्यता बळावली आहे. जमिनीत ओलावाच नसल्याने तुरीचे पिकही यावर्षी नाममात्र होण्याची शक्यता आहे़ जलसिंचनाखालील पिके भारनियमनामुळे धोक्यात आली आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना कसा करवा, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकीय चर्चेत गुंतलेले आहे़ तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना तालुका प्रशासनाने पीक आणेवारी ५० टक्क्यांच्या वर दर्शविली. या दुष्काळी परिस्थितीचा श्रीमंत शेतकरी कसा तरी सामना करू शकेल, मात्र गरीब, अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ इच्छा असूनही शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाही़ त्यामुळे पुढील शेती हंगामासह शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून त्यांचे भवितव्यच धोक्यात आले. (वार्ताहर)