शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

दुष्काळामुळे बळीराजा संकटात

By admin | Updated: October 30, 2014 22:59 IST

राज्यातील राजकीय पक्षांना सरकार स्थापनेच्या चिंतेने ग्रासले असताना दुसरीकडे मात्र जगाचा पोशिंदा यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे चिंतीत झाला आहे़ भविष्यात शेती कशी करावी,

शिंदोला : राज्यातील राजकीय पक्षांना सरकार स्थापनेच्या चिंतेने ग्रासले असताना दुसरीकडे मात्र जगाचा पोशिंदा यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे चिंतीत झाला आहे़ भविष्यात शेती कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे़यंदा वणी उपविभागात बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर अल्प पाऊस पडला़ त्यामुळे ‘न भूतो न भविष्यती’ असा दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ संपूर्ण शेती हंगाम हातचा गेला आहे़ सोयाबिनच्या पिकाने पूर्णत: दगा दिला़ सोयाबिनच्या मशागतीला लागलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. ज्या ठिकाणी एका बॅगला १० ते १२ क्विंटल सोयाबीन व्हायचे, त्या ठिकाणी यावर्षी दोन, तीन क्विंटल सोयाबीन होत आहे. जवळपास कापसाचीही तीच गत आहे़ शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्च निघणेही यावर्षी कठीण झाले आहे़ त्यामुळे सालदार व मजुरांचे पैसे कोठून द्यावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे़ अपुऱ्या पावसाअभावी जमिनीत ओलावा नाही़ त्यामुळे रबी हंगामही धोक्यात सापडला आहे़ आॅक्टोबर महिन्यात एखादा पाऊस झाला असता, तर कपाशीसह रबी पिकांना लाभ झाला असता़ मात्र परतीच्या पावसासह समुद्री वादळानेही हुलकावणी दिली़ त्यामुळे रबी हंगामाची मशागत व्यर्थ जाण्याची शक्यता बळावली आहे. जमिनीत ओलावाच नसल्याने तुरीचे पिकही यावर्षी नाममात्र होण्याची शक्यता आहे़ जलसिंचनाखालील पिके भारनियमनामुळे धोक्यात आली आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना कसा करवा, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकीय चर्चेत गुंतलेले आहे़ तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना तालुका प्रशासनाने पीक आणेवारी ५० टक्क्यांच्या वर दर्शविली. या दुष्काळी परिस्थितीचा श्रीमंत शेतकरी कसा तरी सामना करू शकेल, मात्र गरीब, अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ इच्छा असूनही शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाही़ त्यामुळे पुढील शेती हंगामासह शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून त्यांचे भवितव्यच धोक्यात आले. (वार्ताहर)