शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 5, 2014 01:37 IST

गेल्या २0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

वणी : गेल्या २0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी २६ हजार शेतकरी अडचणीत सापडले असून ३० हजार हेक्टरवरील पिकेही धोक्यात सापडली आहेत. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत मिळाल्याने सुरूवातीला शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण करून पेरणीकडे लक्ष केंद्रित केले होते. तालुक्यात ६४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडी योग्य आहे. त्यापैकी ४६ हजार ३७0 हेक्टरवर कपाशीच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मागील वर्षी ४२ हजार ३३८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. मात्र पावसाने दगा दिल्याने नियोजित क्षेत्रातही अद्याप पेरणी पूर्ण होऊ शकली नाही. आजमितीस तालुक्यात ३0 हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी सोयाबीनचा पेरा कमी होऊन १० हजार ७९८ हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ६०० हेक्टरवर तूर, एक हजार ५० हेक्टरमध्ये संकरित ज्वारी, तर २५ हेक्टरवर इतर पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मात्र पावसाने दडी मारल्याने हे पूर्ण नियोजनच आता कोलमडले आहे. आजपर्यंत ३0 हजार हेक्टरवर कपाशी, तीन हजार हेक्टरवर तूर आणि ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र ही सर्वच पिके आता धोक्यात सापडली आहे. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी आहेत. त्यांची कुटुंबे याच शेतीवर अवलंबून आहेत. मात्र पावसाने दगा दिल्याने ही शेतकरी कुटुंबे आता संकटात सापडली आहे. तालुक्यात केवळ तीन ते चार हजार हेक्टरवरील कपाशी पिकेच सध्या बरी आहेत. उर्वरित जवळपास २६ हजार हेक्टरवरील कपाशी संकटात सापडली आहे. अनेक शेतकरी कपाशीला जगविण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. काहींनी ठिबक तुषार सिंचनाव्दारे कपाशीला पाणी देणे सुरू केले आहे. मात्र भारनियमन आणि विजेच्या लपंडावाने त्यांना ओलित करणेही अशक्य झाले आहे.वणी तालुक्यात मोजकेच क्षेत्र सिंचनाखाली आहे. बहुतांश शेती निर्सगाच्या पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मात्र पावसानेच दगा दिल्याने आता त्यांच्याच डोळ्यात अश्रू तरळत आहे. २६ हजार शेतकऱ्यांची कुटुंबे डोळ्यात पाणी साठवून पावसाची वाट बघत आहेत. मात्र पाऊस निराशा करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांवर आता कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. मागील वर्षी अतिव्ष्टीने घात केला अन् यावर्षी आता पावसाने दगा दिल्याने जगाचा पोशिंदाच हतबल झाला आहे. दुबार पेरणीसाठी आता आर्थिक तजवीज करण्याच्या प्रयत्नात बळीराजा आता मेटाकुटीस आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)