शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचे गौडबंगाल संपता संपेना

By admin | Updated: February 6, 2016 02:43 IST

चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील घोळ दिवसेंदिवस वाढतच आहे.

आर्णी : चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील घोळ दिवसेंदिवस वाढतच आहे. नगरसेवकांमधील समन्वयाचा अभाव व विविध वादांमुळे या योजनेला ग्रहण लागले आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना आर्णीकर जनतेला हुलकावणी देण्याचीच शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या नगरसेवकांनी आपल्या स्वार्थासाठी आर्णीकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा घाट घातला, अशांना येणाऱ्या निवडणुकीत पाणी पाजण्याच्या चर्चा चौकाचौकात सुरू आहे. योजनेचे श्रेय कुणाला जाणार, हे महत्त्वाचे नसून पाणीपुरवठा योजना सुरू होणे आवश्यक होते. आर्णीकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. नगरसेवकांमध्ये पडलेले दोन गट, त्यांच्या आपसी मतभेदातून व स्वार्थातून या योजनेला राजकीय ग्रहण लागले आहे. तत्कालिन मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आर्णी शहरासाठी ४२ कोटी ८० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. अरुणावती धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार होता. अस्तित्वात असलेल्या सोडून दोन नवीन पाण्याच्या टाक्या अनुक्रमे सहा लाख व चार लाख लिटर क्षमतेच्या होणार होत्या. महाळुंगी रोडवर अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच अंतर्गत पाईप लाईनमध्ये सुधारणा अशी कामे या योजनेत होणार होती. परंतु सुरुवातीपासूनच पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे करायचे की खासगी कंपनीद्वारे यावर नगरसेवकांमध्ये मतभेद निर्माण झाले. सुरुवातीला यवतमाळचे खासगी कंत्राटदार यांना काम देण्यावर एकमत झाले असता राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रांजली खंदार यांनी जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे अपील करून १६ नगरसेवकांच्या तोंडाला फेस आणला होता. यात नगरसेवकांचे चांगभले होणार असल्यामुळे एक विरुद्ध सर्व असा सामना सतत रंगत राहिला. आर्णीकरांना शुद्ध पाणी मिळणार की नाही, हा मुद्दा विसरून नगरसेवक स्वार्थातच गुंतले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात पुणे येथील ग्राफिक कंपनीला काम मिळाले, तर नागपूर येथील बी.आर. कंस्ल्टंट कंपनीची निविदा रद्द झाली. २७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात मेहकर येथील आमदार रायमूलकर यांनी निधी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. पीएमसी निविदा प्रक्रियेची चौकशी अंतिम टप्प्यात असून १२ डिसेंबर २०१३ पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून योजना वादातच अडकत आहे. नगरसेवक गणेश हिरोळे यांचा एक गट, तर नगराध्यक्ष आरिज बेग यांचा दुसरा गट पाणीपुरवठा योजनेच्या मुद्यावर आमनेसामने आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यातच नगरसेवकांचा वेळ खर्च होत आहे. आर्णीकरांच्या जिव्हाळ्याची ही योजना असताना कोणाला काम मिळेल, या मुद्यावरच नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. मात्र तिच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे निर्माण करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)आगामी निवडणुकीत ‘पाणी’ गाजणारकाँग्रेसचे नगरसेवक गणेश हिरोळे यांनी पाणीपुरवठ्यासंबंधी व्यथा मांडल्या, तर शिवसेनेच्या नगरसेविका रेखा ढाले यांचे पती विजय ढाले हे ३ फेब्रुवारीपासून लोकप्रतिनिधींच्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मौन धारण करून उपोषणाला बसले. ४ फेब्रुवारीला सकाळी नगराध्यक्ष आरिज बेग, प्रवीण मुनगिनवार, नारायण चेलपेलवार, विठ्ठल देशमुख, राजेंद्र शिवरामवार, छोटू देशमुख, रमेश ठाकरे यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाली. एक महिन्याच्या आत पाणीपुरवठ्याचा तिढा सोडविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. पाणीपुरवठा योजना हा त्यांचा मुद्दा असून शहरातील विविध संघटनासुद्धा योजना पूर्णत्वास नेण्याच्या बाजूच्या आहेत. आर्णीचा पाणीप्रश्न आता पेटला असून राजकारण बाजूला ठेवून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिक करीत आहे. येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाणीपुरवठा योजनेतील घोळाचे परिणाम राजकीय पुढाऱ्यांना नक्कीच दिसतील, असे बोलले जात आहे.