शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
4
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
5
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
6
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
7
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
8
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
10
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
11
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
12
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
13
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
14
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
15
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
17
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
18
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
19
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
20
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ

By admin | Updated: December 13, 2014 22:47 IST

भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे.

यवतमाळ : भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. मागील ७२ तासात दुष्काळग्रस्त भागात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याला केवळ युती शासनाची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप विर्दभ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. भाजप -शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करणे व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी शब्द फिरविला असून तिजोरी खाली असल्यामुळे ते शक्य नाही असे सुतोवाच केले आहे. यामुळे विश्वासघाताच्या धक्याने शेतकरी आत्महत्या होत आहे. ज्या ११ शेतकऱ्यांनी मागील ७२ तासात आपली जीवनयात्रा संपविली त्यांची ओळख माध्यमांनी मोरेश्वर चौधरी रा. देहेली, सुरेश जाधव रा. साखरा, त्याताजी सोनुर्ले रा. नागरगाव, हंसराज भगत रा. घारफळ या यवतमाळ जिल्ह्यातील शेतऱ्यासोबतच कचरु तुपसुंदरे रा. रामपुर जिल्हा अमरावती ,नामदेव खंडारे रा. माथान, वामन राउत रा. चांडोले जिल्हा बुलडाणा, उमाशंकर काटकर रा. आजनी केशव चौधरी रा. बोरगाव नागपूर, पांडुरंग हिवसे रा. खराडी भंडारा, रेवनाथ भारसाकळे रा. नगरी गडचिरोली असून यावर्षी विदर्भात १ हजार ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मस्तवाल अधिकारी शेतकऱ्यांच्या अडचणीची माहिती सरकारला देत नसल्यामुळे सरकार मदतीला विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला. शेतकरी आत्महत्या व समस्यांचा तोडगा सिंचन नसून मातीचा ओलावा असा जावईशोध अधिकाऱ्यांनी लावून नवीन सरकारला पटवून दिल्याने सरकारने शेतकऱ््यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान, संपूर्ण कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करावी, शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही. त्यामुळेच दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत असे किशोर तिवारी यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)