शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ

By admin | Updated: December 13, 2014 22:47 IST

भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे.

यवतमाळ : भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. मागील ७२ तासात दुष्काळग्रस्त भागात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याला केवळ युती शासनाची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप विर्दभ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. भाजप -शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करणे व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी शब्द फिरविला असून तिजोरी खाली असल्यामुळे ते शक्य नाही असे सुतोवाच केले आहे. यामुळे विश्वासघाताच्या धक्याने शेतकरी आत्महत्या होत आहे. ज्या ११ शेतकऱ्यांनी मागील ७२ तासात आपली जीवनयात्रा संपविली त्यांची ओळख माध्यमांनी मोरेश्वर चौधरी रा. देहेली, सुरेश जाधव रा. साखरा, त्याताजी सोनुर्ले रा. नागरगाव, हंसराज भगत रा. घारफळ या यवतमाळ जिल्ह्यातील शेतऱ्यासोबतच कचरु तुपसुंदरे रा. रामपुर जिल्हा अमरावती ,नामदेव खंडारे रा. माथान, वामन राउत रा. चांडोले जिल्हा बुलडाणा, उमाशंकर काटकर रा. आजनी केशव चौधरी रा. बोरगाव नागपूर, पांडुरंग हिवसे रा. खराडी भंडारा, रेवनाथ भारसाकळे रा. नगरी गडचिरोली असून यावर्षी विदर्भात १ हजार ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मस्तवाल अधिकारी शेतकऱ्यांच्या अडचणीची माहिती सरकारला देत नसल्यामुळे सरकार मदतीला विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला. शेतकरी आत्महत्या व समस्यांचा तोडगा सिंचन नसून मातीचा ओलावा असा जावईशोध अधिकाऱ्यांनी लावून नवीन सरकारला पटवून दिल्याने सरकारने शेतकऱ््यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान, संपूर्ण कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करावी, शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही. त्यामुळेच दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत असे किशोर तिवारी यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)