शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

चोरउमरी येथे पुलाअभावी अपघाताचा धोका

By admin | Updated: May 17, 2017 00:55 IST

पावसाळ्यात पूर, त्यानंतर चिखल आणि उन्हाळ्यात गोटाडीचा रस्ता यामुळे चोरउमरी येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव(देवी) : पावसाळ्यात पूर, त्यानंतर चिखल आणि उन्हाळ्यात गोटाडीचा रस्ता यामुळे चोरउमरी येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी पुलाची निर्मिती करावी, यासाठी गावकऱ्यांनी वारंवार दिलेल्या निवेदनाला केराची टोपली मिळाली आहे. लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनाची दखल केवळ ‘रेफर टू’पर्यंत घेतली जात आहे. याविषयी नागरिकांमध्ये रोष आहे. आसेगाव(देवी) ते मांगलादेवी मार्गावरील चोरउमरीजवळ असलेल्या नदीवर गेली ७० वर्षांपासून पूल बांधण्यात आलेला नाही. या मार्गावरून एसटी बसेस, खासगी वाहने, दुचाकी, बैलगाडी आदी प्रकारच्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. पावसाळ्यात मात्र नदीला पूर आल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होते. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नदीतून दगडावरून वाट काढावी लागते. दुचाकीस्वारांना तर उतरूनच मार्ग काढावा लागतो. वाहन कुठे घसरून पडेल याचा नेम नाही. सदर ठिकाणी पूल बांधण्यात यावा, या मागणीचे निवेदन आसेगाव(देवी) येथील लीना भूपेंद्र लुणावत यांनी २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समाधान शिबिरात दिले होते. कळंब तहसीलदारांनी या निवेदनाची प्रत बाभूळगाव तहसीलदारांना पाठविली. तेथून पुढील कारवाईसाठी १७ एप्रिलच्या पत्रानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पत्र पाठविण्यात आले. दाखल झालेल्या तक्रारीवरून पाच महिन्यांचा कालावधी लोटला. प्रत्यक्षात कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.