शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या,महागाई विरोधात वणी तहसीलवर धडकला मोर्चा

By admin | Updated: July 26, 2016 00:05 IST

महाराष्ट्र राज्य किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला.

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा सहभागवणी : महाराष्ट्र राज्य किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला. २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार सत्येत येताच महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्याचे निवेदनात म्हटले आहे. पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, डाळ व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने जनता हवालदिल झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी युवकांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न दाखविले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही दिवसेंदिवस बेरोजगरांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच शेतीमाल नियमनमुक्ती व कृषी उत्पन्न बाजार समितीच्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाची लूटमार सुरू असून त्यात सुधारणा करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. केंद्र शासनाने सन २००६ मध्ये वनाधिकार कायदा लागू करून त्याला १० वर्षे पूर्ण झाली. परंतु या कायद्याच्या नियमप्रमाणे अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे हजारो आदिवासी शेतकरी जीवनयात्रा संपविण्याच्या मानसिकतेत आहे. वन विभागाच्या हस्तक्षेपामुळे या कायद्याचे उल्लंघन होत असून कलमानुसार १३/०३ प्रमाणे सहा पुराव्यापैकी दोन पुरावे असणारे दावे पात्र करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, शेतीमाल नियमन मुक्ती व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात सुधारणा करण्यात यावी, महागाईवर नियंत्रण आणण्यात यावे, वनाधिकार कायद्यानुसार अपात्र ठरलेल्या दाव्यांची फेरचौकशी करून दावे मंजूर करावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देताना शंकर दानव, कुमार मोहरमपूरी, के.पी.सरकार, चंद्रशेखर सिडाम, राम जिड्डेवार, कवडू चांदेकरसह किसान सभा व माकपचे पदाधिकारी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)