शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची वाताहत

By admin | Updated: February 25, 2016 02:27 IST

राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही.

शिक्षकबंदी उठवा : विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाचा इशारादिग्रस : राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही. मागील पाच वर्षांपासून शिक्षक भरतीच राज्यात झालेली नाही. भविष्यात होणार की नाही, असे शिक्षणमंत्र्यांनीच ठणकावून सांगितले असताना टीईटीच्या माध्यमातून शासन स्वत:ची झोळी तर भरण्याचे काम करीत नाही ना, असा सवाल सध्या डीएड व बीएडधारकांना पडला आहे आणि त्यामुळेच मागील दोन वर्षांपासून डीटीएड व बीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. म्हणूनच अनेक डीटीएड कॉलेजेस बंद पडली आहेत. पूर्वी डीएड केले की हमखास नोकरी, असे जणू समीकरणच बनले होते. त्यामुळे डीएड विद्यालयांचाही भाव वधारला होता. अनेक पालक आपल्या पाल्याला बारावीनंतर डीएडकडे वळवायचे. पण नंतर मात्र परिस्थितीत आमूलाग्र बदल होत गेला. आता तर डीएड महाविद्यालय विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्याचे दिसत आहे. संस्थाचालकांना खिरापत म्हणून वाटलेले डीएड कॉलेज आणि त्यातून हजारोच्या संख्येने बाहेर पडलेल्या भावी शिक्षकांच्या संख्येवर कुठेतरी प्रतिबंध येणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आज यवतमाळ जिल्ह्यात हजारो तर राज्यात साडेचार लाखांच्या घरात डीटीएडधारक सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात भटकंती करीत आहे. दुसरीकडे मराठी शाळांचा खालावलेला दर्जा आणि पालकांचा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल, त्यातून शासकीय, जिल्हा परिषद शाळांना लागलेली गळती, त्यातून निर्माण झालेले अतिरिक्त शिक्षक या सर्वांमध्ये भावी शिक्षकांची अक्षरश: कोंडी झाली आहे. अशातच शासनाच्या उदासीन धोरणामुळे टीईटीसारख्या परीक्षांच्या माध्यमातून भावी शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम सुरू आहे. सध्या नर्सरी व केजीच्या गर्दीत शासकीय शाळांचा जीव गुदमरत आहे. आजच्या युगात आपला पाल्य कुठेही कमी पडू नये, या काळजीत पालक आहेत. महत्त्वाचे म्हणजे संस्थाचालकांच्या मक्तेदारीला कुठेतरी वचक निर्माण करून शासकीय शाळांप्रती पालकांचा दृष्टिकोन बदलविण्याची गरज आहे. तेव्हा कुठेतरी भावी शिक्षकांना अच्छे दिन येण्याची प्रतीक्षा बाळगता येईल. तर राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व्हायचे असताना आणि भविष्यात शिक्षक भरतीची सध्यातरी शक्यता नसताना टीईटीसारख्या परीक्षा घेवून विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, सरकारने शिक्षक बंदी उठवावी आणि त्वरित शिक्षकांच्या जागा काढाव्या. डीएड, बीएड, पदवी व पदविकाधारकांना बेरोजगार भत्ताही देण्यात यावा व टीईटीसारख्या परीक्षा सध्या तरी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी अनिवार्य कराव्या व त्यांचे ज्ञान शासनाने अद्यावत करावे, आदी मागण्या डीएड व बीएडधारक विद्यार्थी संघटनांनी केल्या असून या मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)