शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची वाताहत

By admin | Updated: February 25, 2016 02:27 IST

राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही.

शिक्षकबंदी उठवा : विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाचा इशारादिग्रस : राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही. मागील पाच वर्षांपासून शिक्षक भरतीच राज्यात झालेली नाही. भविष्यात होणार की नाही, असे शिक्षणमंत्र्यांनीच ठणकावून सांगितले असताना टीईटीच्या माध्यमातून शासन स्वत:ची झोळी तर भरण्याचे काम करीत नाही ना, असा सवाल सध्या डीएड व बीएडधारकांना पडला आहे आणि त्यामुळेच मागील दोन वर्षांपासून डीटीएड व बीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. म्हणूनच अनेक डीटीएड कॉलेजेस बंद पडली आहेत. पूर्वी डीएड केले की हमखास नोकरी, असे जणू समीकरणच बनले होते. त्यामुळे डीएड विद्यालयांचाही भाव वधारला होता. अनेक पालक आपल्या पाल्याला बारावीनंतर डीएडकडे वळवायचे. पण नंतर मात्र परिस्थितीत आमूलाग्र बदल होत गेला. आता तर डीएड महाविद्यालय विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्याचे दिसत आहे. संस्थाचालकांना खिरापत म्हणून वाटलेले डीएड कॉलेज आणि त्यातून हजारोच्या संख्येने बाहेर पडलेल्या भावी शिक्षकांच्या संख्येवर कुठेतरी प्रतिबंध येणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आज यवतमाळ जिल्ह्यात हजारो तर राज्यात साडेचार लाखांच्या घरात डीटीएडधारक सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात भटकंती करीत आहे. दुसरीकडे मराठी शाळांचा खालावलेला दर्जा आणि पालकांचा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल, त्यातून शासकीय, जिल्हा परिषद शाळांना लागलेली गळती, त्यातून निर्माण झालेले अतिरिक्त शिक्षक या सर्वांमध्ये भावी शिक्षकांची अक्षरश: कोंडी झाली आहे. अशातच शासनाच्या उदासीन धोरणामुळे टीईटीसारख्या परीक्षांच्या माध्यमातून भावी शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम सुरू आहे. सध्या नर्सरी व केजीच्या गर्दीत शासकीय शाळांचा जीव गुदमरत आहे. आजच्या युगात आपला पाल्य कुठेही कमी पडू नये, या काळजीत पालक आहेत. महत्त्वाचे म्हणजे संस्थाचालकांच्या मक्तेदारीला कुठेतरी वचक निर्माण करून शासकीय शाळांप्रती पालकांचा दृष्टिकोन बदलविण्याची गरज आहे. तेव्हा कुठेतरी भावी शिक्षकांना अच्छे दिन येण्याची प्रतीक्षा बाळगता येईल. तर राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व्हायचे असताना आणि भविष्यात शिक्षक भरतीची सध्यातरी शक्यता नसताना टीईटीसारख्या परीक्षा घेवून विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, सरकारने शिक्षक बंदी उठवावी आणि त्वरित शिक्षकांच्या जागा काढाव्या. डीएड, बीएड, पदवी व पदविकाधारकांना बेरोजगार भत्ताही देण्यात यावा व टीईटीसारख्या परीक्षा सध्या तरी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी अनिवार्य कराव्या व त्यांचे ज्ञान शासनाने अद्यावत करावे, आदी मागण्या डीएड व बीएडधारक विद्यार्थी संघटनांनी केल्या असून या मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)