शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची वाताहत

By admin | Updated: February 25, 2016 02:27 IST

राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही.

शिक्षकबंदी उठवा : विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाचा इशारादिग्रस : राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही. मागील पाच वर्षांपासून शिक्षक भरतीच राज्यात झालेली नाही. भविष्यात होणार की नाही, असे शिक्षणमंत्र्यांनीच ठणकावून सांगितले असताना टीईटीच्या माध्यमातून शासन स्वत:ची झोळी तर भरण्याचे काम करीत नाही ना, असा सवाल सध्या डीएड व बीएडधारकांना पडला आहे आणि त्यामुळेच मागील दोन वर्षांपासून डीटीएड व बीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. म्हणूनच अनेक डीटीएड कॉलेजेस बंद पडली आहेत. पूर्वी डीएड केले की हमखास नोकरी, असे जणू समीकरणच बनले होते. त्यामुळे डीएड विद्यालयांचाही भाव वधारला होता. अनेक पालक आपल्या पाल्याला बारावीनंतर डीएडकडे वळवायचे. पण नंतर मात्र परिस्थितीत आमूलाग्र बदल होत गेला. आता तर डीएड महाविद्यालय विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्याचे दिसत आहे. संस्थाचालकांना खिरापत म्हणून वाटलेले डीएड कॉलेज आणि त्यातून हजारोच्या संख्येने बाहेर पडलेल्या भावी शिक्षकांच्या संख्येवर कुठेतरी प्रतिबंध येणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आज यवतमाळ जिल्ह्यात हजारो तर राज्यात साडेचार लाखांच्या घरात डीटीएडधारक सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात भटकंती करीत आहे. दुसरीकडे मराठी शाळांचा खालावलेला दर्जा आणि पालकांचा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल, त्यातून शासकीय, जिल्हा परिषद शाळांना लागलेली गळती, त्यातून निर्माण झालेले अतिरिक्त शिक्षक या सर्वांमध्ये भावी शिक्षकांची अक्षरश: कोंडी झाली आहे. अशातच शासनाच्या उदासीन धोरणामुळे टीईटीसारख्या परीक्षांच्या माध्यमातून भावी शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम सुरू आहे. सध्या नर्सरी व केजीच्या गर्दीत शासकीय शाळांचा जीव गुदमरत आहे. आजच्या युगात आपला पाल्य कुठेही कमी पडू नये, या काळजीत पालक आहेत. महत्त्वाचे म्हणजे संस्थाचालकांच्या मक्तेदारीला कुठेतरी वचक निर्माण करून शासकीय शाळांप्रती पालकांचा दृष्टिकोन बदलविण्याची गरज आहे. तेव्हा कुठेतरी भावी शिक्षकांना अच्छे दिन येण्याची प्रतीक्षा बाळगता येईल. तर राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व्हायचे असताना आणि भविष्यात शिक्षक भरतीची सध्यातरी शक्यता नसताना टीईटीसारख्या परीक्षा घेवून विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, सरकारने शिक्षक बंदी उठवावी आणि त्वरित शिक्षकांच्या जागा काढाव्या. डीएड, बीएड, पदवी व पदविकाधारकांना बेरोजगार भत्ताही देण्यात यावा व टीईटीसारख्या परीक्षा सध्या तरी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी अनिवार्य कराव्या व त्यांचे ज्ञान शासनाने अद्यावत करावे, आदी मागण्या डीएड व बीएडधारक विद्यार्थी संघटनांनी केल्या असून या मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)