शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

पिण्याचे पाणी वळविले शेतीसाठी

By admin | Updated: May 11, 2017 01:10 IST

तालुक्यातील तापमान सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे.

पाणीटंचाईचे संकेत : पूस धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : तालुक्यातील तापमान सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच पुसद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुसद शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार असतानाच पूस धरणातून उन्हाळी भूईमूगासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे पुसदवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला. परिणामी पूस धरण पूर्णपणे भरले होते. परंतु या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने धरण १०० टक्के भरले असतानाही पाणीसाठा हा केवळ ७० टक्केच असतो. ३० टक्केहून अधिक जागा गाळाने व्यापलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र या प्रकल्पावर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या पाण्याचा उपसा करण्यात येतो. या प्रकल्पातून उन्हाळी भूईमूगासाठी पाणी सोडल्या जात असताना संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी या पाण्याचा वापर कशासाठी होतो, पाणी वाहून तर जात नाही ना, याची साधी चौकशीही करीत नाही. केवळ कागदी घोडे नाचविली जात आहे. सध्या पुसद शहराला नियमित एक तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात तो जास्तही केला जातो. कोणतेही नियोजन नसतानाही नगरपरिषद प्रशासन मूग गिळून बसले आहे. ज्या भागात केवळ एक तास पाणी मिळतो तो भाग कमी दाबाचा असल्याने अनेकांचे पाणीच होत नाही. त्यामुळे अनेकांना आताच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शहराला योग्य व नियमित पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. तसेच वाया जाणारे व शेतीला वापर होणारे पाणी थांबविणे आवश्यक आहे. पूस धरणात २० एप्रिल रोजी २६ टक्के जलसाठा होता. ५ मे रोजी २० टक्के तर १० मे रोजी केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या शहराचे तापमान ४३ अंशांच्या वर गेले असून पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यातच प्रशासन भूईमुगाला पाणी सोडत असल्याने हजारो लिटर पाणी वापरण्याऐवजी नाल्यात वाहून जात आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. आजही कॅनॉलमध्ये पाणी सोडल्या जात आहे. पाण्याची नासाडी थांबवून योग्य नियोजन न केल्यास पुसदकरांना पाणीटंचाईची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. पुसद नगर परिषदेचे नियोजनच नाही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणातील पाणीसाठा सध्या अत्यल्प आहे. अशातच याच धरणातील पाणी शेतीसाठी अनेकजण वापरत आहे. परंतु अशावेळी नगर परिषद मात्र मूग गिळून बसल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेकडून आगामी पाणीटंचाई लक्षात घेता कोणतेही नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.