शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

कोरड्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 7, 2014 23:47 IST

हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

चारा महागला : चार लाख हेक्टरची स्थिती हाताबाहेरयवतमाळ : हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पेरणी झालेल्या चार लाख हेक्टरची स्थिती हाताबाहेर गेली असून चाराही महागला आहे.जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिमी आहे. गतवर्षी ११०० मिमी पाऊस कोसळला. यावर्षी एक महिन्यात केवळ वार्षिक सरासरीच्या ७ टक्के पाऊस कोसळला. या अत्यल्प पावसाने खरीपाच्या पेरण्या उलटल्या आहेत. मुंबईत मान्सुन दाखल होताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. जिल्ह्यात सध्यास्थितीत तीन लाख ८६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र पाऊस लांबल्याने पेरण्या उलटल्या आहे.उपाययोजना हव्यातजिल्ह्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या स्थितीतून सावरण्यासाठी ठोस उपाय योजनांची गरज आहे. त्यावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अवलंबून राहणार आहे. वैरण महागले जिल्ह्याच्या जनावरांच्या वैरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना ५ रूपयाची वैरणाची पेंढी २० रूपयात खरेदी करावी लागत आहे. चारा टंचाईच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी चाराडेपो उघडण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही प्रस्ताव सादर केला नाही. यातून शेतकरी संकटात आहे.जिल्ह्यावर ओढवलेले संकट भीषण असून आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनाही त्याचे चटके बसल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शासनाने आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे.गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण भागातील पशुपालकांची पशुंच्या चाऱ्यासाठी भटकंती सुरू आहे. पशुंचा पाण्याचाही प्रश्न आहे. यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने चारा डेपो सुरू करण्याची वारंवार मागणी पशुपालकांमधून करण्यात आली. परंतु या मागणीकडे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दुर्लक्ष केले. त्यातच आता पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पशुंची नियमित तपासणी व लसीकरणसुद्धा रखडले आहे. एकीकडे शेती उद्ध्वस्त होत असताना आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा असलेल्या पशुपालनावरही मोठे संकट उभे ठाकले आहेत.प्रशासन मात्र या सर्व संकटांकडे दुर्लक्ष करीत आहे. शासकीय अधिकारी-कर्मचारीसुद्धा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून या परिस्थितीचा फायदा आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी करीत असल्याचा आरोप ग्रामीण भागातून होत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची साथ दिली नाही. मागील वर्षीचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातातून गेला. त्यानंतर गारपिटीमुळे रबीसुद्धा साथ देवू शकला नाही. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी होते नव्हते ते सोने विकून आता नव्याने खरिपाची तयारी केली होती. यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.दुबार पेरणीसाठी शासनाचे अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतेही नियोजन दिसून येत नाही. कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँका तयार नाही. या सर्व परिस्थितीची झळ शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना बसणार आहे. महागाईचा जोर आताच वाढला आहे. (शहर वार्ताहर)