शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 7, 2014 23:47 IST

हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

चारा महागला : चार लाख हेक्टरची स्थिती हाताबाहेरयवतमाळ : हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पेरणी झालेल्या चार लाख हेक्टरची स्थिती हाताबाहेर गेली असून चाराही महागला आहे.जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिमी आहे. गतवर्षी ११०० मिमी पाऊस कोसळला. यावर्षी एक महिन्यात केवळ वार्षिक सरासरीच्या ७ टक्के पाऊस कोसळला. या अत्यल्प पावसाने खरीपाच्या पेरण्या उलटल्या आहेत. मुंबईत मान्सुन दाखल होताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. जिल्ह्यात सध्यास्थितीत तीन लाख ८६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र पाऊस लांबल्याने पेरण्या उलटल्या आहे.उपाययोजना हव्यातजिल्ह्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या स्थितीतून सावरण्यासाठी ठोस उपाय योजनांची गरज आहे. त्यावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अवलंबून राहणार आहे. वैरण महागले जिल्ह्याच्या जनावरांच्या वैरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना ५ रूपयाची वैरणाची पेंढी २० रूपयात खरेदी करावी लागत आहे. चारा टंचाईच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी चाराडेपो उघडण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही प्रस्ताव सादर केला नाही. यातून शेतकरी संकटात आहे.जिल्ह्यावर ओढवलेले संकट भीषण असून आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनाही त्याचे चटके बसल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शासनाने आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे.गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण भागातील पशुपालकांची पशुंच्या चाऱ्यासाठी भटकंती सुरू आहे. पशुंचा पाण्याचाही प्रश्न आहे. यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने चारा डेपो सुरू करण्याची वारंवार मागणी पशुपालकांमधून करण्यात आली. परंतु या मागणीकडे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दुर्लक्ष केले. त्यातच आता पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पशुंची नियमित तपासणी व लसीकरणसुद्धा रखडले आहे. एकीकडे शेती उद्ध्वस्त होत असताना आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा असलेल्या पशुपालनावरही मोठे संकट उभे ठाकले आहेत.प्रशासन मात्र या सर्व संकटांकडे दुर्लक्ष करीत आहे. शासकीय अधिकारी-कर्मचारीसुद्धा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून या परिस्थितीचा फायदा आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी करीत असल्याचा आरोप ग्रामीण भागातून होत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची साथ दिली नाही. मागील वर्षीचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातातून गेला. त्यानंतर गारपिटीमुळे रबीसुद्धा साथ देवू शकला नाही. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी होते नव्हते ते सोने विकून आता नव्याने खरिपाची तयारी केली होती. यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.दुबार पेरणीसाठी शासनाचे अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतेही नियोजन दिसून येत नाही. कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँका तयार नाही. या सर्व परिस्थितीची झळ शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना बसणार आहे. महागाईचा जोर आताच वाढला आहे. (शहर वार्ताहर)