शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 02:07 IST

विहिरी आटलेल्या. नाले कोरडे ठण्ण पडलेले. गावात टँकरने पाणीपुरवठा. सतत दुष्काळाची छाया. दोन वर्षांपूर्वी असलेले हे चित्र. आता १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाले तुडुंब भरलेले.

समृद्धीकडे वाटचाल : १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाला बंधारे, गाव टँकरमुक्त लोकमत शुभवर्तमानरूपेश उत्तरवार यवतमाळ विहिरी आटलेल्या. नाले कोरडे ठण्ण पडलेले. गावात टँकरने पाणीपुरवठा. सतत दुष्काळाची छाया. दोन वर्षांपूर्वी असलेले हे चित्र. आता १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाले तुडुंब भरलेले. विहिरींनाही मुबलक पाणी. त्यातून आलेली समृद्धी. ही किमया साधली आहे, यवतमाळ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कीटा (कापरा) गावाने. दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार आता जलयुक्त झाले असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही दीडपट वाढ झाली आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले आदिवासी बहुल कीटा म्हणजे काही वर्षापूर्वी समस्यांचे माहेरघर होते. या गावात कोणत्याच सुविधा नव्हत्या. कामासाठी येथील नागरिकांना यवतमाळकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावातील नाल्यावर बांध बांधण्यात आले. त्यामुळे गावातील विहिरींचा जलस्रोत वाढला. परिणामी कोरडवाहू शेती ओलिताखाली आली. यामुळे गावाने समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. अवघ्या दोन वर्षात झालेला हा बदल गावकऱ्यांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा आहे. आता संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आहे. अल्पपावसाने शेतकरी चिंतेत आहे. मात्र कीटातील शेतकऱ्यांना कसलीच चिंता दिसत नाही. मृद आणि जलसंधारण पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून गावामध्ये माती आणि सिमेंट नाला बांध बांधण्यात आले होते. याठिकाणी मोठा गाळ साचला होता. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गाळ काढण्यात आला. तसेच काही बांध नव्याने बांधण्यात आले. परिणामी यंदाच्या अल्प पावसातही बंधारे तुडुंब भरले आहे. या बंधाऱ्यांमुळे शेतातील विहिरींचा जलस्तर वाढला आहे. जून महिन्यातील पावसाच्या खंडानंतरही येथील शेतकऱ्यांच्या विहिरींना मुबलक पाणी आहे. शेतशिवार जलयुक्त तर झालेच परंतु यामुळे गाव टँकरमुक्तही झाले आहे. २०१२ पूर्वी या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता गत वर्षीपासून गाव टँकरमुक्त झाले आहे. कधी नव्हे ते ४०० एकर शेती ओलिताखाली आली आहे. एक पीक घेणारे शेतकरी आता दोन ते तीन पीक घेत आहे. मुबलक पाण्यामुळे पिकांचीही वाढ जोमाने होत आहे. यामुळेच शेतकरी आता शेवगा, टरबुज, खरबूज, कोहळे आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे. तरुणाई वळली जोडधंद्याकडे कधी काळी कामाच्या शोधात यवतमाळकडे धाव घेणारे येथील तरुण आता जोडधंद्याकडे वळले आहे. शेतीसोबतच त्यांनी दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन सुरू केले आहे. शेतात नवनवीन प्रयोग करण्याकडेही या शेतकऱ्यांचा कल असून मलचिंग पेपरचा प्रयोग या गावात शेतकरी करीत असून त्यामुळे तणनियंत्रण होत आहे. सामूहिक शेतीसाठी पुढाकारआत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग हाती घेतला आहे. शेतकऱ्यांचा गट स्थापन करून शेतकरी बचत करीत आहे. हा प्रयोग कीटा कापरा येथेही सुरू केला जाणार आहे.