शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 02:07 IST

विहिरी आटलेल्या. नाले कोरडे ठण्ण पडलेले. गावात टँकरने पाणीपुरवठा. सतत दुष्काळाची छाया. दोन वर्षांपूर्वी असलेले हे चित्र. आता १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाले तुडुंब भरलेले.

समृद्धीकडे वाटचाल : १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाला बंधारे, गाव टँकरमुक्त लोकमत शुभवर्तमानरूपेश उत्तरवार यवतमाळ विहिरी आटलेल्या. नाले कोरडे ठण्ण पडलेले. गावात टँकरने पाणीपुरवठा. सतत दुष्काळाची छाया. दोन वर्षांपूर्वी असलेले हे चित्र. आता १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाले तुडुंब भरलेले. विहिरींनाही मुबलक पाणी. त्यातून आलेली समृद्धी. ही किमया साधली आहे, यवतमाळ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कीटा (कापरा) गावाने. दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार आता जलयुक्त झाले असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही दीडपट वाढ झाली आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले आदिवासी बहुल कीटा म्हणजे काही वर्षापूर्वी समस्यांचे माहेरघर होते. या गावात कोणत्याच सुविधा नव्हत्या. कामासाठी येथील नागरिकांना यवतमाळकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावातील नाल्यावर बांध बांधण्यात आले. त्यामुळे गावातील विहिरींचा जलस्रोत वाढला. परिणामी कोरडवाहू शेती ओलिताखाली आली. यामुळे गावाने समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. अवघ्या दोन वर्षात झालेला हा बदल गावकऱ्यांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा आहे. आता संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आहे. अल्पपावसाने शेतकरी चिंतेत आहे. मात्र कीटातील शेतकऱ्यांना कसलीच चिंता दिसत नाही. मृद आणि जलसंधारण पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून गावामध्ये माती आणि सिमेंट नाला बांध बांधण्यात आले होते. याठिकाणी मोठा गाळ साचला होता. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गाळ काढण्यात आला. तसेच काही बांध नव्याने बांधण्यात आले. परिणामी यंदाच्या अल्प पावसातही बंधारे तुडुंब भरले आहे. या बंधाऱ्यांमुळे शेतातील विहिरींचा जलस्तर वाढला आहे. जून महिन्यातील पावसाच्या खंडानंतरही येथील शेतकऱ्यांच्या विहिरींना मुबलक पाणी आहे. शेतशिवार जलयुक्त तर झालेच परंतु यामुळे गाव टँकरमुक्तही झाले आहे. २०१२ पूर्वी या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता गत वर्षीपासून गाव टँकरमुक्त झाले आहे. कधी नव्हे ते ४०० एकर शेती ओलिताखाली आली आहे. एक पीक घेणारे शेतकरी आता दोन ते तीन पीक घेत आहे. मुबलक पाण्यामुळे पिकांचीही वाढ जोमाने होत आहे. यामुळेच शेतकरी आता शेवगा, टरबुज, खरबूज, कोहळे आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे. तरुणाई वळली जोडधंद्याकडे कधी काळी कामाच्या शोधात यवतमाळकडे धाव घेणारे येथील तरुण आता जोडधंद्याकडे वळले आहे. शेतीसोबतच त्यांनी दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन सुरू केले आहे. शेतात नवनवीन प्रयोग करण्याकडेही या शेतकऱ्यांचा कल असून मलचिंग पेपरचा प्रयोग या गावात शेतकरी करीत असून त्यामुळे तणनियंत्रण होत आहे. सामूहिक शेतीसाठी पुढाकारआत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग हाती घेतला आहे. शेतकऱ्यांचा गट स्थापन करून शेतकरी बचत करीत आहे. हा प्रयोग कीटा कापरा येथेही सुरू केला जाणार आहे.