शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
3
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
4
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
5
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
6
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
7
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
8
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
9
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
10
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
11
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
12
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
13
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
14
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
15
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
16
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
17
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
18
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
19
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
20
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 02:07 IST

विहिरी आटलेल्या. नाले कोरडे ठण्ण पडलेले. गावात टँकरने पाणीपुरवठा. सतत दुष्काळाची छाया. दोन वर्षांपूर्वी असलेले हे चित्र. आता १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाले तुडुंब भरलेले.

समृद्धीकडे वाटचाल : १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाला बंधारे, गाव टँकरमुक्त लोकमत शुभवर्तमानरूपेश उत्तरवार यवतमाळ विहिरी आटलेल्या. नाले कोरडे ठण्ण पडलेले. गावात टँकरने पाणीपुरवठा. सतत दुष्काळाची छाया. दोन वर्षांपूर्वी असलेले हे चित्र. आता १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाले तुडुंब भरलेले. विहिरींनाही मुबलक पाणी. त्यातून आलेली समृद्धी. ही किमया साधली आहे, यवतमाळ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कीटा (कापरा) गावाने. दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार आता जलयुक्त झाले असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही दीडपट वाढ झाली आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले आदिवासी बहुल कीटा म्हणजे काही वर्षापूर्वी समस्यांचे माहेरघर होते. या गावात कोणत्याच सुविधा नव्हत्या. कामासाठी येथील नागरिकांना यवतमाळकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावातील नाल्यावर बांध बांधण्यात आले. त्यामुळे गावातील विहिरींचा जलस्रोत वाढला. परिणामी कोरडवाहू शेती ओलिताखाली आली. यामुळे गावाने समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. अवघ्या दोन वर्षात झालेला हा बदल गावकऱ्यांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा आहे. आता संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आहे. अल्पपावसाने शेतकरी चिंतेत आहे. मात्र कीटातील शेतकऱ्यांना कसलीच चिंता दिसत नाही. मृद आणि जलसंधारण पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून गावामध्ये माती आणि सिमेंट नाला बांध बांधण्यात आले होते. याठिकाणी मोठा गाळ साचला होता. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गाळ काढण्यात आला. तसेच काही बांध नव्याने बांधण्यात आले. परिणामी यंदाच्या अल्प पावसातही बंधारे तुडुंब भरले आहे. या बंधाऱ्यांमुळे शेतातील विहिरींचा जलस्तर वाढला आहे. जून महिन्यातील पावसाच्या खंडानंतरही येथील शेतकऱ्यांच्या विहिरींना मुबलक पाणी आहे. शेतशिवार जलयुक्त तर झालेच परंतु यामुळे गाव टँकरमुक्तही झाले आहे. २०१२ पूर्वी या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता गत वर्षीपासून गाव टँकरमुक्त झाले आहे. कधी नव्हे ते ४०० एकर शेती ओलिताखाली आली आहे. एक पीक घेणारे शेतकरी आता दोन ते तीन पीक घेत आहे. मुबलक पाण्यामुळे पिकांचीही वाढ जोमाने होत आहे. यामुळेच शेतकरी आता शेवगा, टरबुज, खरबूज, कोहळे आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे. तरुणाई वळली जोडधंद्याकडे कधी काळी कामाच्या शोधात यवतमाळकडे धाव घेणारे येथील तरुण आता जोडधंद्याकडे वळले आहे. शेतीसोबतच त्यांनी दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन सुरू केले आहे. शेतात नवनवीन प्रयोग करण्याकडेही या शेतकऱ्यांचा कल असून मलचिंग पेपरचा प्रयोग या गावात शेतकरी करीत असून त्यामुळे तणनियंत्रण होत आहे. सामूहिक शेतीसाठी पुढाकारआत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग हाती घेतला आहे. शेतकऱ्यांचा गट स्थापन करून शेतकरी बचत करीत आहे. हा प्रयोग कीटा कापरा येथेही सुरू केला जाणार आहे.