शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विदर्भ, मराठवाड्यावर दुष्काळाची सावली

By admin | Updated: July 9, 2014 23:54 IST

संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे २० लाख हेक्टरवरील पेरणी पूर्णत: मोडकळीस आली आहे. दुबार पेरणीची वेळही निघून जात असून विदर्भ व मराठवाड्यावर दुष्काळाची भीषण सावली आहे.

यवतमाळ : संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे २० लाख हेक्टरवरील पेरणी पूर्णत: मोडकळीस आली आहे. दुबार पेरणीची वेळही निघून जात असून विदर्भ व मराठवाड्यावर दुष्काळाची भीषण सावली आहे. या गंभीर बाबीची केंद्र व राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे दुष्काळाचा फटका बसलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १२ जुलै रोजी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात पांढरकवडा येथे उपोषण सत्याग्रह करण्यात येणार आहे.जून महिन्यात ७, ११, १७ व २४ तारखेला पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेली कापूस व सोयाबीनची पेरणी पावसाने दडी मारल्यामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. लगतच्या तेलंगणा राज्याप्रमाणे राज्य सरकार तत्काळ मदत जाहीर करणार, ही अपेक्षा आता फोल ठरली असून शेतकरी मात्र हतबल झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भ व मराठवाडा दुष्काळाचा सामना करत असून पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.खरिपाच्या पेरणीसाठी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून व्यवस्था केली होती. त्यानंतर दुबार पेरणीसाठी घरचे सोनेसुद्धा गहाण ठेवून पीककर्ज काढावे लागले. तेसुद्धा वाया गेले आहे. लगतच्या तेलंगणा सरकारने तत्काळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत, सोने गहाण ठेवून घेतलेले कर्ज माफ केले. महाराष्ट्र सरकारने कुठलेच पाऊल उचलले नाही. या संदर्भात विदर्भ जनआंदोलन समितीने राज्य व केंद्र सरकारला २० जूनला निवेदन पाठवून शेतकऱ्यांना बियाणे व नव्याने कर्ज द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र अजूनपर्यंत शासनाने कुठलेच पाऊल उचलले नाही. विशेष म्हणजे अधिकारीवर्ग शासनाची दिशाभूल करीत असून पेरणी झाली नाही अथवा फार कमी झाली, अशी माहिती सरकारला देत आहे. सहकारी व सरकारी बँकांनी फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. आता सावकार व कृषी केंद्र चालकही शेतकऱ्यांना उधार बियाणे देण्यास तयार नसून लोकप्रतिनिधी मात्र या बाबत उदासीन असल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी पत्रकातून केला आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला शासनाने धावून यावे, अशी मागणी तिवारी यांनी केली असून १२ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)