शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

३० लाख हेक्टरातील खरीप पिकाचा दगा

By admin | Updated: October 21, 2014 22:59 IST

विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ

यवतमाळ : विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न आणि नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी आणि मदत घोषित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्यपालांकडे विनंती केली आहे.यावर्षी विदर्भात पावसाने २५ आॅगस्टला हजेरी लावली. मध्यंतरीच्या काळात वरुणराजा रुसला. १७ सप्टेंबरनंतर पाऊस गायब झाल्याने दुबार-तिबार पेरणी बहुतांश शेतकऱ्यांना करावी लागली. कसेबसे बियाणे उगवल्यानंतर भारनियमनामुळे नुकसान झाले. या सर्व प्रकारात ३० लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाले.सोयाबीन उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अडीच हजार खर्च आला. प्रत्यक्ष उत्पादन दोन हजार रुपये होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरल्यानंतर केवळ ८० किलो इतके उत्पादन होत आहे. याशिवाय लागवण आणि मजुरीचा खर्च झाला तो वेगळाच. अनेकांनी सोयाबीनची ही परिस्थिती पाहता त्यात जनावरे सोडणे पसंत केले. अधिकारी मात्र सरकारला यासंदर्भात अंधारात ठेवत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.नगदी पीक कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जावू नये म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत आहे. २० लाख हेक्टरात कपाशीची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. या पिकाचे उत्पादन एकरी एक ते दोन क्विंटलही होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यातच बाजारभाव हमी भावापेक्षा कमी झाला आहे. त्यामळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. दिवाळी सण दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा शासनाच्या मदतीवर आहे. (वार्ताहर)