शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

३० लाख हेक्टरातील खरीप पिकाचा दगा

By admin | Updated: October 21, 2014 22:59 IST

विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ

यवतमाळ : विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न आणि नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी आणि मदत घोषित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्यपालांकडे विनंती केली आहे.यावर्षी विदर्भात पावसाने २५ आॅगस्टला हजेरी लावली. मध्यंतरीच्या काळात वरुणराजा रुसला. १७ सप्टेंबरनंतर पाऊस गायब झाल्याने दुबार-तिबार पेरणी बहुतांश शेतकऱ्यांना करावी लागली. कसेबसे बियाणे उगवल्यानंतर भारनियमनामुळे नुकसान झाले. या सर्व प्रकारात ३० लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाले.सोयाबीन उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अडीच हजार खर्च आला. प्रत्यक्ष उत्पादन दोन हजार रुपये होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरल्यानंतर केवळ ८० किलो इतके उत्पादन होत आहे. याशिवाय लागवण आणि मजुरीचा खर्च झाला तो वेगळाच. अनेकांनी सोयाबीनची ही परिस्थिती पाहता त्यात जनावरे सोडणे पसंत केले. अधिकारी मात्र सरकारला यासंदर्भात अंधारात ठेवत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.नगदी पीक कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जावू नये म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत आहे. २० लाख हेक्टरात कपाशीची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. या पिकाचे उत्पादन एकरी एक ते दोन क्विंटलही होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यातच बाजारभाव हमी भावापेक्षा कमी झाला आहे. त्यामळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. दिवाळी सण दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा शासनाच्या मदतीवर आहे. (वार्ताहर)