शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

३० लाख हेक्टरातील खरीप पिकाचा दगा

By admin | Updated: October 21, 2014 22:59 IST

विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ

यवतमाळ : विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न आणि नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी आणि मदत घोषित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्यपालांकडे विनंती केली आहे.यावर्षी विदर्भात पावसाने २५ आॅगस्टला हजेरी लावली. मध्यंतरीच्या काळात वरुणराजा रुसला. १७ सप्टेंबरनंतर पाऊस गायब झाल्याने दुबार-तिबार पेरणी बहुतांश शेतकऱ्यांना करावी लागली. कसेबसे बियाणे उगवल्यानंतर भारनियमनामुळे नुकसान झाले. या सर्व प्रकारात ३० लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाले.सोयाबीन उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अडीच हजार खर्च आला. प्रत्यक्ष उत्पादन दोन हजार रुपये होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरल्यानंतर केवळ ८० किलो इतके उत्पादन होत आहे. याशिवाय लागवण आणि मजुरीचा खर्च झाला तो वेगळाच. अनेकांनी सोयाबीनची ही परिस्थिती पाहता त्यात जनावरे सोडणे पसंत केले. अधिकारी मात्र सरकारला यासंदर्भात अंधारात ठेवत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.नगदी पीक कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जावू नये म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत आहे. २० लाख हेक्टरात कपाशीची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. या पिकाचे उत्पादन एकरी एक ते दोन क्विंटलही होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यातच बाजारभाव हमी भावापेक्षा कमी झाला आहे. त्यामळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. दिवाळी सण दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा शासनाच्या मदतीवर आहे. (वार्ताहर)