शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दुष्काळाने ग्रामीण व्यवसायांवर संक्रांत

By admin | Updated: November 29, 2014 02:23 IST

लांबलेला पाऊस, किडींचे आक्रमण अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला.

स्वप्नील कनवाळे   पोफाळीलांबलेला पाऊस, किडींचे आक्रमण अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. उमरखेड तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. या दुष्काळाचे दुष्परिणाम दिसायला लागले असून ग्रामीण भागातील व्यवसायांवर अवकळा आली आहे. रोजी-रोजी पुरतेही पैसे व्यवसायातून मिळत नसल्याने अनेकांनी शहराकडे धाव घेणे सुरू केले आहे. लग्नसराईचा हंगामही मंदावल्याचे दिसत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. यावर्षीही खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग हातचे गेले. लावलागवडीचा खर्च तर सोडा मजुरांचे पैसेही घरुन द्यावे लागले. अशा स्थितीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली आहे. कुण्याही शेतकऱ्याच्या हातात पैसे नाही. पैसेच नाही तर खरेदी करताना दहादा विचार करावा लागतो. शेतात काम नसल्याने मजुरांजवळही पैसा दिसत नाही. केवळ शासकीय धान्यावर त्यांची गुजरान सुरू आहे. या सर्व बाबींचा परिणाम ग्रामीण भागातील व्यवसायावर होत आहे. पानटपरी, हॉटेल, किराणा दुकान, इस्त्री दुकान यासह गावात येणाऱ्या विक्रेत्यांना त्याचा फटका बसत आहे. सुगीचा हंगाम सुरू झाला की, विविध प्रकारचे विक्रेते गावात साहित्य घेऊन विकायला येतात. परंतु यंदा शेतकऱ्याजवळ पैसेच नसल्याने विक्रेते गावात रिकामे फिरताना दिसत आहे. दोन वेळच्या भोजनाचीही यातून व्यवस्था होत नाही. त्यामुळे अनेकांनी आता शहराकडे धाव घेणे सुरू केले आहे. शेतकरी मात्र आजही रबीच्या आशेवर दिसत आहे. जीवनावश्यक व्यवहार करून गुजरान करीत आहे. अद्यापपर्यंत शासनाने दुष्काळाची मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहे.तुळशीचे लग्न झाले की, ग्रामीण भागात लग्न सराईला सुरुवात होते. लग्न म्हटले की मोठा खर्च. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांना रोजगार मिळतो. बँड वाल्यांपासून मंडप डेकोरेशन आणि आचाऱ्यांंंना काम मिळते. परंतु पैसा नसल्याने अनेक जण लग्न पुढे ढकलण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. छोटे-मोठे व्यावसायिक हातघाईस आले आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न पडला आहे.