शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

दुष्काळाने ग्रामीण व्यवसायांवर संक्रांत

By admin | Updated: November 29, 2014 02:23 IST

लांबलेला पाऊस, किडींचे आक्रमण अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला.

स्वप्नील कनवाळे   पोफाळीलांबलेला पाऊस, किडींचे आक्रमण अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. उमरखेड तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. या दुष्काळाचे दुष्परिणाम दिसायला लागले असून ग्रामीण भागातील व्यवसायांवर अवकळा आली आहे. रोजी-रोजी पुरतेही पैसे व्यवसायातून मिळत नसल्याने अनेकांनी शहराकडे धाव घेणे सुरू केले आहे. लग्नसराईचा हंगामही मंदावल्याचे दिसत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. यावर्षीही खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग हातचे गेले. लावलागवडीचा खर्च तर सोडा मजुरांचे पैसेही घरुन द्यावे लागले. अशा स्थितीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली आहे. कुण्याही शेतकऱ्याच्या हातात पैसे नाही. पैसेच नाही तर खरेदी करताना दहादा विचार करावा लागतो. शेतात काम नसल्याने मजुरांजवळही पैसा दिसत नाही. केवळ शासकीय धान्यावर त्यांची गुजरान सुरू आहे. या सर्व बाबींचा परिणाम ग्रामीण भागातील व्यवसायावर होत आहे. पानटपरी, हॉटेल, किराणा दुकान, इस्त्री दुकान यासह गावात येणाऱ्या विक्रेत्यांना त्याचा फटका बसत आहे. सुगीचा हंगाम सुरू झाला की, विविध प्रकारचे विक्रेते गावात साहित्य घेऊन विकायला येतात. परंतु यंदा शेतकऱ्याजवळ पैसेच नसल्याने विक्रेते गावात रिकामे फिरताना दिसत आहे. दोन वेळच्या भोजनाचीही यातून व्यवस्था होत नाही. त्यामुळे अनेकांनी आता शहराकडे धाव घेणे सुरू केले आहे. शेतकरी मात्र आजही रबीच्या आशेवर दिसत आहे. जीवनावश्यक व्यवहार करून गुजरान करीत आहे. अद्यापपर्यंत शासनाने दुष्काळाची मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहे.तुळशीचे लग्न झाले की, ग्रामीण भागात लग्न सराईला सुरुवात होते. लग्न म्हटले की मोठा खर्च. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांना रोजगार मिळतो. बँड वाल्यांपासून मंडप डेकोरेशन आणि आचाऱ्यांंंना काम मिळते. परंतु पैसा नसल्याने अनेक जण लग्न पुढे ढकलण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. छोटे-मोठे व्यावसायिक हातघाईस आले आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न पडला आहे.