शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

दुष्काळाने ग्रामीण व्यवसायांवर संक्रांत

By admin | Updated: November 29, 2014 02:23 IST

लांबलेला पाऊस, किडींचे आक्रमण अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला.

स्वप्नील कनवाळे   पोफाळीलांबलेला पाऊस, किडींचे आक्रमण अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. उमरखेड तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. या दुष्काळाचे दुष्परिणाम दिसायला लागले असून ग्रामीण भागातील व्यवसायांवर अवकळा आली आहे. रोजी-रोजी पुरतेही पैसे व्यवसायातून मिळत नसल्याने अनेकांनी शहराकडे धाव घेणे सुरू केले आहे. लग्नसराईचा हंगामही मंदावल्याचे दिसत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. यावर्षीही खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग हातचे गेले. लावलागवडीचा खर्च तर सोडा मजुरांचे पैसेही घरुन द्यावे लागले. अशा स्थितीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली आहे. कुण्याही शेतकऱ्याच्या हातात पैसे नाही. पैसेच नाही तर खरेदी करताना दहादा विचार करावा लागतो. शेतात काम नसल्याने मजुरांजवळही पैसा दिसत नाही. केवळ शासकीय धान्यावर त्यांची गुजरान सुरू आहे. या सर्व बाबींचा परिणाम ग्रामीण भागातील व्यवसायावर होत आहे. पानटपरी, हॉटेल, किराणा दुकान, इस्त्री दुकान यासह गावात येणाऱ्या विक्रेत्यांना त्याचा फटका बसत आहे. सुगीचा हंगाम सुरू झाला की, विविध प्रकारचे विक्रेते गावात साहित्य घेऊन विकायला येतात. परंतु यंदा शेतकऱ्याजवळ पैसेच नसल्याने विक्रेते गावात रिकामे फिरताना दिसत आहे. दोन वेळच्या भोजनाचीही यातून व्यवस्था होत नाही. त्यामुळे अनेकांनी आता शहराकडे धाव घेणे सुरू केले आहे. शेतकरी मात्र आजही रबीच्या आशेवर दिसत आहे. जीवनावश्यक व्यवहार करून गुजरान करीत आहे. अद्यापपर्यंत शासनाने दुष्काळाची मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहे.तुळशीचे लग्न झाले की, ग्रामीण भागात लग्न सराईला सुरुवात होते. लग्न म्हटले की मोठा खर्च. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांना रोजगार मिळतो. बँड वाल्यांपासून मंडप डेकोरेशन आणि आचाऱ्यांंंना काम मिळते. परंतु पैसा नसल्याने अनेक जण लग्न पुढे ढकलण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. छोटे-मोठे व्यावसायिक हातघाईस आले आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न पडला आहे.