शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चालकाला काढावी लागली बसमध्ये रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 21:58 IST

अपघात हाताळण्यासाठी अधिकारी न पोहोचल्याने चालकाला संपूर्ण रात्र बसमध्ये काढावी लागली. यवतमाळ आगाराच्या या गलथान कारभारामुळे कामगारांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देगलथान कारभार : बाभूळगाव येथील घटना, आगाराचे अधिकारी पोहोचले १२ तास उशिरा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : अपघात हाताळण्यासाठी अधिकारी न पोहोचल्याने चालकाला संपूर्ण रात्र बसमध्ये काढावी लागली. यवतमाळ आगाराच्या या गलथान कारभारामुळे कामगारांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार कामगार सेनेचे यवतमाळ आगार अध्यक्ष शैलेश जगदाळे यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे.१५ मार्च रोजी यवतमाळ-धामणगाव (बस क्र. ८३५१) ही बस रात्री ९.१५ वाजता बाभूळगाव येथील कॉटन मार्केटजवळ उभ्या ट्रकवर आदळली. घटनेची माहिती चालकाने बसस्थानक प्रमुखांना कळविली. यानुसार प्रवाशांच्या सोयीकरिता चालकासह दुसरी बस पाठविण्यात आली. मात्र अपघात हाताळण्याची जबाबदारी असलेले आगार प्रमुख, बसस्थानक प्रमुख व इतर पर्यवेक्षकांपैकी कोणीही घटनास्थळी पोहोचले नाही. यवतमाळ आगार ते अपघातस्थळ हे अंतर केवळ २५ किलोमीटर आहे. मात्र कुठल्याही अधिकाऱ्याने तत्काळ तेथे पोहोचण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे चालक कुमरे यांना संपूर्ण रात्र बसमध्ये काढावी लागली. दुसºया दिवशी अर्थात १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बसस्थानक प्रमुख घटनास्थळी पोहोचले. तब्बल १२ तास बसचा खोळंबा झाला. एफआयआर होण्यास उशीर झाला. आगार प्रमुख किंवा बसस्थानक प्रमुख वेळीच पोहोचले असते तर राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा जनमाणसात मलीन होण्यापासून वाचविता आली असती, असे जगदाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.‘त्या’ घटनेची आठवणकाही दिवसांपूर्वी पुलगाव आगाराची नादुरुस्त बस रस्त्यावर उभी होती. बराचवेळपर्यंत मदत मिळाली नाही. मदतीच्या प्रतीक्षेत थांबलेल्या चालक-वाहकांचा अपघातात मृत्यू झाला होता. केवळ अधिकाºयांचा बेजबाबदारपणा या घटनेला कारणीभूत ठरला. या घटनेपासूनही बोध घेतला जात नाही. अपघात हाताळण्यासाठी चालढकल केली जाते. बाभूळगाव येथील घटनेविषयीसुद्धा बेजबाबदारपणा दिसून आला आहे. या अधिकाºयांवर राज्य परिवहन महामंडळाच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई व्हावी, असे शैलेश जगदाळे यांनी म्हटले आहे.