शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

४१३ गावांमध्ये ठिबक सिंचन

By admin | Updated: October 16, 2015 02:11 IST

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ४१३ गावांची निवड करून ग्रामसभेची मंजुरी घेऊन गाव आराखडा तयार करण्यात आला.

जलयुक्त शिवार अभियान : ८४ हजार ९५१ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमतासुहास सुपासे यवतमाळ जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ४१३ गावांची निवड करून ग्रामसभेची मंजुरी घेऊन गाव आराखडा तयार करण्यात आला. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी या ४१३ गावांमध्ये २७२ हेक्टरवर ठिबक सिंचन तर ३५१४ हेक्टरवर तुषार सिंचन बसविण्यात आले आहे. जुलै २०१५ अखेर ४१३ गावांपैकी ३०२ गावांमध्ये पूर्ण झालेली कामे दोन हजार ५२३ असून प्रगतीपथावरील कामे १६७ आहेत. एकूण कामांची संख्या दोन हजार ६९० आहेत. लोकसहभाग व शासकीय कामातून पाच लाख ५० हजार घनमिटर गाळ काढण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत सहा कोटी ८८ लाख रुपये आहे. पूर्ण झालेल्या कामातून ८४ हजार ९५१ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून या पूर्णत्वास गेलेल्या कामातून एक लाख ३९ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ४१३ गावांमध्ये अस्तित्वात असलेले ९१६ सिमेंट नाला बांध व २७ माती नाला बांध आहेत. १०४ जुन्या सिमेंट नाला बांधाची दुरूस्ती झाली असून ३३४ नाला खोलीकरण व सरळीकरणची कामे करण्यात आली आहेत. २४ मातीनाला बांध दुरुस्तीचे काम करण्यात आले आहेत. ६८ केटीवेअरच्या गेटसाठी महात्मा फुले व भूमी संधारण अभियाना अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. ५३.७१ कोटींच्या विशेष निधीतून १७७ साखळी सिमेंट बांधासाठी २८ कोटींचे नियोजन उर्वरित २५.७१ कोटींमधून अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे खोल सलग समतल चर व नाला खोलीकरण व सरळीकरण इत्यादी कामे डिसेंबर २०१५ अखेर करण्याचे उदिष्ठ ठेवून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडलेल्या ४१३ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये १५ लाखांचे कामे करून तालुका स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेततळे, ढाळीचे बांध व विहीर पुनर्रभरण कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत वेबसाईट तयार करून त्यावर गाव निहाय माहिती टाकण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र निकेतन, जगदंबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जवाहरलाल दर्डा इन्स्टिटयूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज, भाऊसाहेब नंदुरकर इंजिनिअरिंग, बीएनसीओ इंजिनिअरिंग व साई पॉलिटेक्निक आदींची निवड करण्यात आली आहे.