शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

४१३ गावांमध्ये ठिबक सिंचन

By admin | Updated: October 16, 2015 02:11 IST

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ४१३ गावांची निवड करून ग्रामसभेची मंजुरी घेऊन गाव आराखडा तयार करण्यात आला.

जलयुक्त शिवार अभियान : ८४ हजार ९५१ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमतासुहास सुपासे यवतमाळ जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ४१३ गावांची निवड करून ग्रामसभेची मंजुरी घेऊन गाव आराखडा तयार करण्यात आला. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी या ४१३ गावांमध्ये २७२ हेक्टरवर ठिबक सिंचन तर ३५१४ हेक्टरवर तुषार सिंचन बसविण्यात आले आहे. जुलै २०१५ अखेर ४१३ गावांपैकी ३०२ गावांमध्ये पूर्ण झालेली कामे दोन हजार ५२३ असून प्रगतीपथावरील कामे १६७ आहेत. एकूण कामांची संख्या दोन हजार ६९० आहेत. लोकसहभाग व शासकीय कामातून पाच लाख ५० हजार घनमिटर गाळ काढण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत सहा कोटी ८८ लाख रुपये आहे. पूर्ण झालेल्या कामातून ८४ हजार ९५१ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून या पूर्णत्वास गेलेल्या कामातून एक लाख ३९ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ४१३ गावांमध्ये अस्तित्वात असलेले ९१६ सिमेंट नाला बांध व २७ माती नाला बांध आहेत. १०४ जुन्या सिमेंट नाला बांधाची दुरूस्ती झाली असून ३३४ नाला खोलीकरण व सरळीकरणची कामे करण्यात आली आहेत. २४ मातीनाला बांध दुरुस्तीचे काम करण्यात आले आहेत. ६८ केटीवेअरच्या गेटसाठी महात्मा फुले व भूमी संधारण अभियाना अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. ५३.७१ कोटींच्या विशेष निधीतून १७७ साखळी सिमेंट बांधासाठी २८ कोटींचे नियोजन उर्वरित २५.७१ कोटींमधून अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे खोल सलग समतल चर व नाला खोलीकरण व सरळीकरण इत्यादी कामे डिसेंबर २०१५ अखेर करण्याचे उदिष्ठ ठेवून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडलेल्या ४१३ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये १५ लाखांचे कामे करून तालुका स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेततळे, ढाळीचे बांध व विहीर पुनर्रभरण कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत वेबसाईट तयार करून त्यावर गाव निहाय माहिती टाकण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र निकेतन, जगदंबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जवाहरलाल दर्डा इन्स्टिटयूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज, भाऊसाहेब नंदुरकर इंजिनिअरिंग, बीएनसीओ इंजिनिअरिंग व साई पॉलिटेक्निक आदींची निवड करण्यात आली आहे.