शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

४१३ गावांमध्ये ठिबक सिंचन

By admin | Updated: October 16, 2015 02:11 IST

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ४१३ गावांची निवड करून ग्रामसभेची मंजुरी घेऊन गाव आराखडा तयार करण्यात आला.

जलयुक्त शिवार अभियान : ८४ हजार ९५१ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमतासुहास सुपासे यवतमाळ जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ४१३ गावांची निवड करून ग्रामसभेची मंजुरी घेऊन गाव आराखडा तयार करण्यात आला. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी या ४१३ गावांमध्ये २७२ हेक्टरवर ठिबक सिंचन तर ३५१४ हेक्टरवर तुषार सिंचन बसविण्यात आले आहे. जुलै २०१५ अखेर ४१३ गावांपैकी ३०२ गावांमध्ये पूर्ण झालेली कामे दोन हजार ५२३ असून प्रगतीपथावरील कामे १६७ आहेत. एकूण कामांची संख्या दोन हजार ६९० आहेत. लोकसहभाग व शासकीय कामातून पाच लाख ५० हजार घनमिटर गाळ काढण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत सहा कोटी ८८ लाख रुपये आहे. पूर्ण झालेल्या कामातून ८४ हजार ९५१ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून या पूर्णत्वास गेलेल्या कामातून एक लाख ३९ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ४१३ गावांमध्ये अस्तित्वात असलेले ९१६ सिमेंट नाला बांध व २७ माती नाला बांध आहेत. १०४ जुन्या सिमेंट नाला बांधाची दुरूस्ती झाली असून ३३४ नाला खोलीकरण व सरळीकरणची कामे करण्यात आली आहेत. २४ मातीनाला बांध दुरुस्तीचे काम करण्यात आले आहेत. ६८ केटीवेअरच्या गेटसाठी महात्मा फुले व भूमी संधारण अभियाना अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. ५३.७१ कोटींच्या विशेष निधीतून १७७ साखळी सिमेंट बांधासाठी २८ कोटींचे नियोजन उर्वरित २५.७१ कोटींमधून अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे खोल सलग समतल चर व नाला खोलीकरण व सरळीकरण इत्यादी कामे डिसेंबर २०१५ अखेर करण्याचे उदिष्ठ ठेवून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडलेल्या ४१३ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये १५ लाखांचे कामे करून तालुका स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेततळे, ढाळीचे बांध व विहीर पुनर्रभरण कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत वेबसाईट तयार करून त्यावर गाव निहाय माहिती टाकण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र निकेतन, जगदंबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जवाहरलाल दर्डा इन्स्टिटयूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज, भाऊसाहेब नंदुरकर इंजिनिअरिंग, बीएनसीओ इंजिनिअरिंग व साई पॉलिटेक्निक आदींची निवड करण्यात आली आहे.