शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न अधुरेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र पांढरकवडा नगरपरिषदमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम अंत्यत संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजना : पांढरकवडा नगरपरिषदेचे काम संथगतीने

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र पांढरकवडा नगरपरिषदमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम अंत्यत संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पांढरकवडा नगरपरिषदेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात २२० घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी केवळ ८६ घरकुलांचे काम सुरू करण्यात आले असून हे काम अद्यापही रखडले आहे. सन २०१९-२० करिता २०० घरकुलांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सन २०१९-२० मधील मंजुर घरकुलांपैकी एकाही घराचे काम अद्याप सुरू झाले नाही. मुळात ही योजना गरिबांसाठी आहे किंवा नाही, यावरच प्रश्नचिन्ह आहे. कारण या योजनेअंतर्गत बांधकामाचा पैसा हा पाच टप्प्यात लाभार्थ्याला दिला जातो.एक एक टप्पा पूर्ण झाल्याची पाहणी केल्यानंतर पैशांचा चेक दिला जातो. परंतु नगरपरिषदेकडे या योजनेअंतर्गत निधी नसल्याने गरिब नागरिक आपापल्या झोपड्या पाडून पक्के घर मिळेल, या आशेने चेकची वाट पाहत आहेत. परंतु रक्कम मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. एवढेच नव्हे तर बांधकाम करण्याकरिता तोडलेले झोपडीवजा घर अपूर्ण असल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. उसणवार, उधार करून काहींनी घराचे काम तर चालू केले.परंतु पहिल्याच टप्प्यात जास्त पैसा लागत असल्याने व नगरपरिषदेकडून वेळेवर पैसे न मिळाल्याने काम अर्ध्यावर रखडले आहे. त्यामुळे हे लाभार्थी घर सोडून बेघर झाले आहेत.त्यांचे पक्क्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. या योजनेअंतर्गत पांढरकवडा नगरपरिषदेत सन २०१८-१९ मध्ये २२० घरकुल व सन २०१९-२० मध्ये २०० असे एकूण ४२० पात्र लाभार्थी आहेत. मात्र यापैकी सन २०१८-१० मधील २२० पैकी ८६ घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले आणि अद्यापही पूर्ण झाले नाही, तर उर्वरित ३३४ पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल बांधणीस अद्यापही सुरूवात झाली नाही. यामुळे २०२२ पर्यंत सर्व कुटुंबांना घर देण्याचे मोदी सरकारचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजना तर आली. परंतु निधी अजूनही अप्राप्त आहे.निधीअभावी घरांचे काम राहिले अर्धवटशासनाने पहिल्या टप्प्यातील निधी लाभार्थ्यांना दिला. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली जुनी घरे पाडून नवीन घराच्या बांधकामाला सुरूवात केली आहे. मात्र आता निधी उपलब्ध न झाल्यामुळे घराचे काम अर्धवटच राहिले आहे.विधानसाभा निवडणूक व त्यानंतर दिवाळीच्या सुट्या आल्यामुळे नगरपरिषदेला निधी उपलब्ध झाला नाही. यापूर्वी जेवढा निधी आला तो लाभार्थ्यांना देण्यात आला. यानंतर आता येणारा निधी हा उर्वरित लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.- अश्विनी वासेकर,अभियंता, प्रधानमंत्री आवास योजना.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना