शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दिग्रस तालुक्यातील युवकांचे रोजगाराचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST

दिग्रस : तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचे स्वप्न भंगले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील औद्योगिक विकास महामंडळाने जमीन अधिग्रहित करून एमआयडीसीचा ...

दिग्रस : तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचे स्वप्न भंगले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील औद्योगिक विकास महामंडळाने जमीन अधिग्रहित करून एमआयडीसीचा केवळ बोर्ड लावून ठेवला. हा बोर्ड तरुणांना रोजगाराच्या वाकुल्या दाखवीत आहे.

लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात आजपर्यंत एकही मोठा उद्योग सुरू झाला नाही. आता एमआयडीसीचा लावण्यात आलेला फलकही गंज लागून सडून गेला आहे. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे स्वप्न भंग पावले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात महाराष्ट्र शासन औद्योगिक विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी लघु उद्योग सुरू करण्यासाठी भूमी अधिग्रहण केली. त्यातील अनेक तालुक्यातील एमआयडीसीच्या जागेवर छोटे-छोटे उद्योगही सुरु झाले. मात्र, दिग्रस तालुका या उद्योगाच्या स्पर्धेत कितीतरी मागे राहिला आहे.

इतर तालुक्यांप्रमाणे दिग्रस शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्णी मार्गावर एमआयडीसीसाठी भूमी अधिग्रहण करण्यात आले. त्यावेळी रस्ते, पाणी, विजेची समस्या समोर करून इच्छुक उद्योजकांना तिकडे येऊच दिले नाही. त्यामुळे भूमी अधिग्रहण करणे एवढेच कार्य झाले. त्या जागी महाराष्ट्र उद्योग मंडळाने लावलेले फलक आता तालुक्यातील बेरोजगारांना वाकुल्या दाखवीत आहे. कोणतीही निवडणूक आली की, मोठी-मोठी आश्वासने देणारे स्थानिक आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी मात्र या औद्योगिक विकासाच्या संदर्भात काहीच बोलत नाहीत. निवडून आले की, तालुक्याकडे दुर्लक्ष केले जाते. असे नेहमीच घडत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक समस्या अजूनही जशाच्या तशाच आहेत.

बॉक्स

एकमेव जिनिंगही पडला बंद

आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जागा अधिग्रहण केलेल्या परिसरात पाणी, रस्ते, विजेचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे येथे उद्योजकांनी छोटे-छोटे उद्योग उभारायला हरकत नाही. तशा प्रकारचे प्रोत्साहन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने दिल्यास निश्चितच तालुक्यात उद्योग सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. शहरात एक उद्योग म्हणून जिनिंग होता. तोही कापसाचा नापिकीमुळे बंद पडला आहे. आता शहरात एखादा उद्योग उभा राहिल्यास तालुक्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल.