शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नाट्यगृह बांधकामाचे ‘नाटक’ १५ वर्षांपासून सुरूच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:21 IST

शहरात अद्ययावत नाट्यगृह बांधकामाचे नाटक २००३ पासून सुरू आहे. या नाट्याचा अंक सिव्हिल काम झाल्यानंतर रखडला. सातत्याने आर्थिक चणचण गेल्याने नगरपरिषदेला कामच करता आले नाही. खर्चाचे बजेट आता १० कोटींच्या घरात आहे.

ठळक मुद्देरसिकांना प्रतीक्षा : अ. भा.साहित्य संमेलनात लोकार्पणाची अपेक्षा

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात अद्ययावत नाट्यगृह बांधकामाचे नाटक २००३ पासून सुरू आहे. या नाट्याचा अंक सिव्हिल काम झाल्यानंतर रखडला. सातत्याने आर्थिक चणचण गेल्याने नगरपरिषदेला कामच करता आले नाही. खर्चाचे बजेट आता १० कोटींच्या घरात आहे. यवतमाळात जानेवारीत ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ही सुवर्ण संधी तब्बल ४५ वर्षानंतर चालून आली. साहित्य संमेलनाला आलेल्या सारस्वतांची पायधूळ नाट्यगृहाला लागावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे. बांधकाम नाट्याचा पडदा लवकर उठला तरच हे शक्य आहे.राज्यासह देशातील नामवंत साहित्यिकांची ११, १२, १३ जानेवारी असे तीन दिवस यवतमाळात मांदियाळी होणार आहे. अखिल भारतीय स्तरावरचे साहित्य संमेलन असल्याने एकाच वेळी अनेक कार्यक्रम आयोजित आहे. मुख्य कार्यक्रम पोस्टल मैदानात असला तरी साहित्याशी निगडीत अनेक इतर कार्यक्रम एकाच वेळी इतरत्र चालणार आहेत. यामध्ये नगरपरिषदेच्या नाट्यगृहाला योगदान देता येण्याची संधी आहे. साहित्य संमेलनात एकाच वेळी परिसंवाद, ग्रंथदालन, काव्य वाचन, व्याख्यान, मराठी मुशायरा, नवोदित साहित्याचे प्रकाशन असे एक ना अनेक कार्यक्रम होतात. एक हजार आसनक्षमतेच्या नाट्यगृहाची या सोहळ््यामध्ये मोलाची मदत ठरू शकते, ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. फक्त ३० टक्के काम व्हायचे असून त्यासाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध आहे. मुबंई येथील आर्किटेक्चर यू. सी. जैन यांनी आराखडा तयार केला आहे. हे नाट्यगृह यवतमाळच्या लौकिकात भर टाकणारेच आहे.पालिकेचे आता मार्चमध्ये लोकार्पणाचे नियोजनआता नगपरिषद बांधकाम विभागाने मार्च अखेरपर्यंत नाट्यगृहाचे लोकार्पण करण्याचे नियोजित केले असून कामही सुरू आहे. इलेक्ट्रिक सोडून सर्वच कामे सुरू आहेत. किचकट आणि गुंतागुतीचे काम असल्याने त्याला वेळ लागतो. कमीत कमी वेळेत नाट्यगृह पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नगरअभियंता विनायक देशमुख यांनी सांगितले. हेच काम जर अधिक गतीने दोन महिन्यात पूर्ण झाले तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच नाट्यगृहाचा पडदा उठविता येईल.