शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा एपीएमसीची श्रेणी घट

By admin | Updated: July 15, 2015 03:10 IST

तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव जिवंत सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रेणीत मोठी घसरण झाली आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : उत्पन्न घटले, शेतीमालाला योग्य भावच मिळत नाहीमुकेश इंगोले दारव्हा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव जिवंत सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रेणीत मोठी घसरण झाली आहे. कधीकाळी अ श्रेणीत असणारी ही संस्था आता क श्रेणीत आहे. उत्पन्न घटल्यामुळे बाजार समितीवर ही वेळ आली आहे.दारव्हा तालुक्यातील जवळपास सर्व मोठ्या सहकारी संस्था डबघाईला येवून बंद पडल्या आहे. अशा स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती तेवढी फक्त कशीबशी सुरू आहे. परंतु या संस्थेकडे लोकप्रतिनिधीसह सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नावापुरती उरलेल्या या संस्थेचीसुद्धा तशीच गत होवू शकते. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला दारव्हा आणि ग्रामीण परिसर भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. सुपीक जमीन, पाण्याची व्यवस्था असल्याने येथील प्रयोगशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पन्न घेतात. परंतु शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते.शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. सर्व प्रकारच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीचे लिलाव पद्धतीने व्यवहार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. परंतु दारव्हा बाजार समितीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होताना दिसत नाही. व्यापाऱ्यांना यार्डमध्ये येवून लिलाव पद्धतीने माल खरेदी करण्यात रस नाही. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी कापूस, धान्याच्या खरेदीसाठी आपापली दुकाने थाटली असून त्याच ठिकाणी माल खरेदी केला जातो. बाजार समितीत लिलाव होत नसल्याने शेतकऱ्यांनाही नाईलाजास्तव आपला माल खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागतो. परंतु या व्यवहारात योग्य भाव तर मिळत नाहीच उलट वजन काट्यातूनही शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता असते.मालाचा लिलाव होत नसल्याने माल खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होत नाही. त्यामुळे पडेल किमतीत मालाची खरेदी केल्या जाते. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. या ठिकाणी भाव मिळत नसल्याने मोठ्या शेतकऱ्यांचा कल शेजारील नेर, आर्णी, कारंजा येथील बाजार समितीमध्ये माल विक्रीकरिता घेऊन जाण्याकडे असतो. या सर्व बाबींचा परिणाम शेतकऱ्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नावर देखील होत आहे. कारण व्यवहार कमी असल्याने बाजार समितीला पूर्वीसारखा सेस मिळत नाही. कधीकाळी या संस्थेचे उत्पन्न एक कोटी रुपयांपर्यंत होते. उत्पन्नाच्या भरवशावर तालुकास्तरावरील असणाऱ्या या बाजार समितीने अ श्रेणी मिळविली होती. परंतु त्यानंतर मात्र उत्पन्न ५७ लाखावर आल्याने ब श्रेणीत यावे लागले. आता तर केवळ ११ लाखावर उत्पन्न आल्याने क श्रेणीत घसरण झाली आहे. ही घसरण व्हायला पणन महासंघाची एकाधिकार पद्धतीने सुरू असलेली कापूस खरेदी बंद होणे, सतत नैसर्गिक आपत्तीमुळे होत असलेली नापिकी आणि खुल्या बाजारपेठेमुळे कुठेही माल विक्रीची मुभा आदी कारणे सांगितली जातात.