शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

दारव्हा महसूल विभाग कंत्राटदारांच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन होऊनही महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यासाठी अद्याप सवड मिळालेली नाही. यावरून या विभागाचे अधिकारी बांधकाम कंत्राटदारांच्या दावणीला बांधल्याची ओरड जनतेतून होऊ लागली आहे.७०० कोटींच्या महामार्गाचे बांधकाम केले जात आहे. या ...

ठळक मुद्दे७०० कोटींचा महामार्ग : अवैध उत्खनन, अधिकाऱ्यांना वेळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन होऊनही महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यासाठी अद्याप सवड मिळालेली नाही. यावरून या विभागाचे अधिकारी बांधकाम कंत्राटदारांच्या दावणीला बांधल्याची ओरड जनतेतून होऊ लागली आहे.७०० कोटींच्या महामार्गाचे बांधकाम केले जात आहे. या एकाच कामाचे दोन कंत्राटदारांकडून बांधकाम होत आहे. त्यासाठी या कंत्राटदारांनी दारव्हा व दिग्रस तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले आहे. परवानगीपेक्षा अधिक जागेत व प्रमाणात हे उत्खनन करण्यात आले. या गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी पोलीस व आरटीओच्या अधिकाºयांना हाताशी धरुन चक्क कालबाह्य व विना क्रमांकाच्या टिप्पर व वाहनांचा वापर केला जात आहे. त्यासाठी ही वाहने चोरट्या मार्गाने तेलंगणातून पिंपळखुटी चेक पोस्टच्या डोळ्यात धूळ फेक करुन जिल्ह्यात आणण्यात आली आहे. ‘लोकमत’ने या संबंधी वृत्तही प्रकाशित केले. मात्र त्यानंतरही दारव्ह्याचा महसूल विभाग हलला नाही. तहसीलदारांनी संंबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्यांना चौकशीचे आदेश दिले. परंतु वरिष्ठांची खानापूर्ती लक्षात आल्याने या कनिष्ठांनीही त्यांना जुमानले नाही. त्यांनी आपला चौकशी अहवालाच सादर केला नाही. म्हणून दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांनी या दोघांनाही कारणेदाखवा नोटीस बजावली. त्यांची ही कारवाई शासकीय खानापूर्ती असल्याचे स्पष्ट होत आहे.वास्तविक तालुका व उपविभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करून जमिनीतील ‘हांडे’ खाली केले जात असताना महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांना तेथे स्थळ भेटीसाठी वेळ मिळू नये, यातच त्यांचे खरे अपयश लपले आहे. महसूल खात्याच्या संगनमतानेच हे अवैध उत्खनन झाल्याचा संशय येऊ लागला आहे. खनिकर्म विभागाचे अधिकारीही यात सहभागी असण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास वेगळेच वास्तव उघड होण्याची शक्यता आहे.