शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

लॉकडाऊन नकोच, गरिबांना जगू द्या हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:41 IST

घाटंजी : कोरोनाशी लढताना नियम कठीण करा; पण लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका येथील सामान्यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत ...

घाटंजी : कोरोनाशी लढताना नियम कठीण करा; पण लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका येथील सामान्यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, कोरोनासोबत आपल्याला जगावे लागेल. एक वर्षापासून अनेक क्षेत्रांतील व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्या जगण्याची अगोदर सोय करा आणि मग लॉकडाऊन करा, अशी मागणी आहे.

काही प्रमाणात लॉकडाऊन पाहिजे असे म्हणणारे आहेत. ते शासकीय कर्मचारी किंवा गर्भश्रीमंत आहेत. त्यांचा विचार करू नका. केवळ जे उपाशी आहेत, त्यांचा विचार करा. नियम कितीही कठोर असू द्या. जनता त्याचे पालन करेल. मात्र, लॉकडाऊन नकोच, अशी त्यांची भूमिका आहे. संपूर्ण भारतात अशी अनेक कुटुंबे आहेत, की त्यांच्या घरात एकच कमविता आहे. बाकीचे त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊनचा निर्णय मागे घेऊन, त्याऐवजी आठवड्यातून चार दिवस व्यवसाय करण्याची सूट द्यावी आणि तीन दिवस लॉकडाऊन करावा, अशी मागणी करण्यात आली. लॉकडाऊन कायम राहिल्यास लोक उपासमारीमुळे आत्महत्या करतील. त्यामुळे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बारकाईने विचार करावा, अशी मागणी जितेंद्र विलास जुनघरे व इतरांनी निवेदनातून केली आहे.