शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला घाबरू नका, पण खबरदारी जरूर बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो बाहेर देशात गेला होता काय, हे पाहिले जाते. त्यानंतर उपचार केला जातो.

ठळक मुद्देसध्याच मास्क लावण्याची गरज नाही

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे. कोणीही घाबरू नये.- डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सकरुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या दहशतीने जिल्ह्यात वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक जण सर्दी, खोकला आणि शिंका येणाऱ्या व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहात आहे. मुळात कोरोना आणि सर्वसामान्य आजार यात फरक आहे. घाबरण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घ्यावीच लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागणार आहे. स्वच्छता पाळावी लागणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याशी साधलेला संवाद...सर्दी-खोकल्याचे रूग्ण आणि कोरोनाचे रूग्ण यात काय फरक आहे?वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो बाहेर देशात गेला होता काय, हे पाहिले जाते. त्यानंतर उपचार केला जातो. कोरोनाचा विषाणू भारतात निर्माण झालेला नाही. या आजारात सतत ताप राहतो. खोकला थांबत नाही. इतरही काही लक्षणे असतात. त्याकरिता तीन चाचण्या घेतल्या जातात. तीन चाचण्या ‘निगेटीव्ह’ आल्यावरच रूग्णाला सुटी दिली जाते.मास्क बांधणे आवश्यक आहे काय?मुळात मास्कची काहीच सध्याच गरज नाही. उलट अधिक वेळ मास्क राहिला तर त्यावरूनही जंतू पसरू शकतात. त्यापेक्षा स्वच्छ रूमाल वापरला तरी चालेल. तो दररोज स्वच्छ धुतलेला असावा. स्वच्छ रूमाल सुरक्षित आहे.हॅन्डवॉश गरजेचे आहे काय?कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. यामध्ये स्वत:ची स्वच्छता, परिसर स्वच्छता करणे आणि वारंवार हात धुतले पाहिजे. स्वच्छ पाण्याने, साबणाने धुतले तरी चालतील. भाज्या धुऊन आणि पूर्ण शिजवूनच खाव्या. आपली स्वच्छता ही विषाणू पसरण्यापासून पायबंद घालण्यास मदत करणारी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगली पाहिजे.६० वर्षांवरील वृद्धांना जपण्याची आवश्यकताकोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपरिषद अशी सर्वच यंत्रणा अलर्ट आहे. ती युद्धपातळीवर काम करीत आहे. प्रत्येक ठिकाणी जनजागृतीचे काम सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार कोरोना रूग्णात ६० वर्षावरील नागरिकांची संख्या जास्त आहे. ० ते ९ वर्षे वयोगटात अशा रूग्णांची संख्या नगण्य आहे. २० वर्षापेक्षा अधिक वय असणाºया रूग्णांची संख्या केवळ २ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना