शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर पालकमंत्र्यांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:14 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्दे‘मेडिकल’ प्रशासनाविरोधात तक्रार । मंत्र्यांनी दिला सबुरीचा सल्ला, धुसफूस चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच ज्येष्ठ-कनिष्ठ असा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिस्तीच्या नावाने अनाठाई निर्णय लादले जातात, अशी तक्रार आहे. तर दुसरीकडे रुग्णसेवा व वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन जाग्यावर आणण्याकरिता कठोर निर्णय घेणे अनिवार्य असल्याचे सांगून कारवाईचे समर्थन केले जाते. दिरंगाई व चूक आढळल्यास तत्काळ चौकशी नेमणे, नोटीसा बजावणे हा प्रकार सुरू आहे. अशाही स्थितीत डॉक्टरांनी आपला संयम ठेवला. मात्र गोपनीय अहवाल पाठविताना अनेकांचे गुण अर्ध्यापेक्षा कमी करण्यात आले. ही बाब जिव्हारी लागली. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला. पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन त्यांनी आपल्यावर कसा अन्याय होतो, याचा पाढाच वाचला. आम्ही रुग्णालय सोडल्यास पर्याय नाही, असेही सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी तुम्ही संयम ठेवून काम करत राहा, अशी सूचना केली. या प्रकरणात निश्चितच तोडगा काढला जाईल, असेही सांगण्यात आले. मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बाहेर आली. सर्वच समदुखी डॉक्टर एकत्र येऊन पालकमंत्र्यांकडे दाद मागायला गेले होते. ही बैठक अतिशय गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. आता पालकमंत्री ही अडचण कशी दूर करतात, याकडे लक्ष लागले आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले ‘मेडिकल’यवतमाळचे वैद्यकीय महाविद्यालय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. १६ तालुके व दुर्गम भाग असल्याने येथे अनेक प्रकारचे रुग्ण येतात. विशेष करून विषबाधा (विषप्राशन केलेले) झालेले सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये दाखल होतात. शेतकरी आत्महत्या असो किंवा फवारणीतून झालेली विषबाधा, दूषित पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचे जडलेले पोटाचे आजार घेऊन रुग्ण येथे येतात. जनआधार मिळविण्यासाठी रुग्णसेवा हा एक मार्ग असल्याने मेडिकल कॉलेजमध्ये अनेक नेत्यांचा इंटरेस्ट वाढला आहे. डॉक्टरातील अंतर्गत धुसफूस ही या नेत्यांसाठी आयतीच संधी ठरणारा आहे. विधानसभा निवडणुकीमुळे याला आणखी रंगत येण्याची चिन्हे आहेत.