शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

डॉक्टर पालकमंत्र्यांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:14 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्दे‘मेडिकल’ प्रशासनाविरोधात तक्रार । मंत्र्यांनी दिला सबुरीचा सल्ला, धुसफूस चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच ज्येष्ठ-कनिष्ठ असा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिस्तीच्या नावाने अनाठाई निर्णय लादले जातात, अशी तक्रार आहे. तर दुसरीकडे रुग्णसेवा व वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन जाग्यावर आणण्याकरिता कठोर निर्णय घेणे अनिवार्य असल्याचे सांगून कारवाईचे समर्थन केले जाते. दिरंगाई व चूक आढळल्यास तत्काळ चौकशी नेमणे, नोटीसा बजावणे हा प्रकार सुरू आहे. अशाही स्थितीत डॉक्टरांनी आपला संयम ठेवला. मात्र गोपनीय अहवाल पाठविताना अनेकांचे गुण अर्ध्यापेक्षा कमी करण्यात आले. ही बाब जिव्हारी लागली. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला. पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन त्यांनी आपल्यावर कसा अन्याय होतो, याचा पाढाच वाचला. आम्ही रुग्णालय सोडल्यास पर्याय नाही, असेही सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी तुम्ही संयम ठेवून काम करत राहा, अशी सूचना केली. या प्रकरणात निश्चितच तोडगा काढला जाईल, असेही सांगण्यात आले. मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बाहेर आली. सर्वच समदुखी डॉक्टर एकत्र येऊन पालकमंत्र्यांकडे दाद मागायला गेले होते. ही बैठक अतिशय गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. आता पालकमंत्री ही अडचण कशी दूर करतात, याकडे लक्ष लागले आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले ‘मेडिकल’यवतमाळचे वैद्यकीय महाविद्यालय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. १६ तालुके व दुर्गम भाग असल्याने येथे अनेक प्रकारचे रुग्ण येतात. विशेष करून विषबाधा (विषप्राशन केलेले) झालेले सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये दाखल होतात. शेतकरी आत्महत्या असो किंवा फवारणीतून झालेली विषबाधा, दूषित पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचे जडलेले पोटाचे आजार घेऊन रुग्ण येथे येतात. जनआधार मिळविण्यासाठी रुग्णसेवा हा एक मार्ग असल्याने मेडिकल कॉलेजमध्ये अनेक नेत्यांचा इंटरेस्ट वाढला आहे. डॉक्टरातील अंतर्गत धुसफूस ही या नेत्यांसाठी आयतीच संधी ठरणारा आहे. विधानसभा निवडणुकीमुळे याला आणखी रंगत येण्याची चिन्हे आहेत.