शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

डॉक्टर पालकमंत्र्यांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:14 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्दे‘मेडिकल’ प्रशासनाविरोधात तक्रार । मंत्र्यांनी दिला सबुरीचा सल्ला, धुसफूस चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवासस्थान गाठले. शनिवारी दुपारनंतर येथे बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी डॉक्टरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच ज्येष्ठ-कनिष्ठ असा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिस्तीच्या नावाने अनाठाई निर्णय लादले जातात, अशी तक्रार आहे. तर दुसरीकडे रुग्णसेवा व वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन जाग्यावर आणण्याकरिता कठोर निर्णय घेणे अनिवार्य असल्याचे सांगून कारवाईचे समर्थन केले जाते. दिरंगाई व चूक आढळल्यास तत्काळ चौकशी नेमणे, नोटीसा बजावणे हा प्रकार सुरू आहे. अशाही स्थितीत डॉक्टरांनी आपला संयम ठेवला. मात्र गोपनीय अहवाल पाठविताना अनेकांचे गुण अर्ध्यापेक्षा कमी करण्यात आले. ही बाब जिव्हारी लागली. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला. पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन त्यांनी आपल्यावर कसा अन्याय होतो, याचा पाढाच वाचला. आम्ही रुग्णालय सोडल्यास पर्याय नाही, असेही सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी तुम्ही संयम ठेवून काम करत राहा, अशी सूचना केली. या प्रकरणात निश्चितच तोडगा काढला जाईल, असेही सांगण्यात आले. मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस बाहेर आली. सर्वच समदुखी डॉक्टर एकत्र येऊन पालकमंत्र्यांकडे दाद मागायला गेले होते. ही बैठक अतिशय गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. आता पालकमंत्री ही अडचण कशी दूर करतात, याकडे लक्ष लागले आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले ‘मेडिकल’यवतमाळचे वैद्यकीय महाविद्यालय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. १६ तालुके व दुर्गम भाग असल्याने येथे अनेक प्रकारचे रुग्ण येतात. विशेष करून विषबाधा (विषप्राशन केलेले) झालेले सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये दाखल होतात. शेतकरी आत्महत्या असो किंवा फवारणीतून झालेली विषबाधा, दूषित पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचे जडलेले पोटाचे आजार घेऊन रुग्ण येथे येतात. जनआधार मिळविण्यासाठी रुग्णसेवा हा एक मार्ग असल्याने मेडिकल कॉलेजमध्ये अनेक नेत्यांचा इंटरेस्ट वाढला आहे. डॉक्टरातील अंतर्गत धुसफूस ही या नेत्यांसाठी आयतीच संधी ठरणारा आहे. विधानसभा निवडणुकीमुळे याला आणखी रंगत येण्याची चिन्हे आहेत.