शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

नागरिकांची कामे तत्परतेने करा

By admin | Updated: February 10, 2016 03:11 IST

प्रशासनाबाहेर असताना प्रशासनाकडून जनतेची गैरसोय होत असल्याबद्दल आपण नेहमीच टीका करतो.

सचिंद्र प्रताप सिंह : कोषागार कार्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिरयवतमाळ : प्रशासनाबाहेर असताना प्रशासनाकडून जनतेची गैरसोय होत असल्याबद्दल आपण नेहमीच टीका करतो. मात्र प्रशासनात सहभागी झाल्यानंतर त्याच व्यवस्थेचा आपणही कणा बनतो. त्यानंतर त्या टीका आपल्याला निरर्थक वाटायला लागतात. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून कुठलाही त्रास न होता सहजरित्या त्यांची कामे निकाली निघाली पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले.बचत भवन येथे लेखा व कोषागारे दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती भोंडे, स्थानिक लेखाचे सहायक संचालक प्रशांत ढाबरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी नागरिकांच्या हितासाठी कर्मचाऱ्यांनी नेहमीच कर्तव्यरत राहिले पाहिजे, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर निवृत्तीवेतन प्रदान करीत असल्याबद्दल कोषागार कार्यालयाचे अभिनंदन केले. कोषागार अधिकारी ज्योती भोंडे यांनी वित्त विभागाची भूमिका विषद केली. लेखा व कोषागारे दिनानिमित्त सकाळच्या सत्रात कोषागार कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच रांगोळी, डिश डेकोरेशन स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. रक्तदान शिबिरात ३१ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मारोती कुचनकर व त्यांची चमू उपस्थित होती. सायंकाळी बचत भवन येथेच सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळीही जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांनी गीतगायन व नृत्य सादर केले. प्रास्ताविक कोषागार अधिकारी ज्योती भोंडे यांनी केले. तर आभार प्रमोद पोहकार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)