शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

व्यापारी पद्धतीने शेती केल्यास आत्महत्येची वेळ येणार नाही

By admin | Updated: June 17, 2017 01:15 IST

बाजारात काय विकते यानुसार शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीने शेती केल्यास राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही,

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : बाजारात काय विकते यानुसार शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीने शेती केल्यास राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुसद येथे मराठा जनसंवाद दौऱ्यानिमित्त अ‍ॅड.खेडेकर आले असता त्यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास बातचित केली. शेतकऱ्यांनी शेतीपती होण्यापेक्षा उद्योगपती व्हावे, ही भूमिका मराठा सेवा संघाने मागील २६ वर्षांपासून घेतली आहे. जात्यावर बसले की दळायला येते, याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पाल्यांना टप्प्याटप्प्याने शेतीपासून दूर करायला हवे. पाल्यांनी आपले पर्याय आपल्या व्यक्तिगत कौशल्यावर निवडले पाहिजे. शेती हा मराठा सेवा संघाला लागलेला फार मोठा फास आहे. जगात कोणीही शेतकरी मोठा झाला नाही. शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलविली पाहिजे. जिवंत राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. बाजारात काय विकते, यानुसार शेतकऱ्यांनी शेती करावी, असे त्यांनी सांगितले. मराठा सेवा संघाच्या उद्दिष्टाबाबत बोलताना अ‍ॅड.खेडेकर म्हणाले, १९९० मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. ३३ कक्षांची निर्मिती करून सर्व घटकांना समाविष्ट करण्यात आले. आता मात्र लोककल्याणकारी कार्य करण्याची परंपरा खंडित झाली आहे. जुने, नवे पदाधिकारी यांच्यात वितंडवाद आहे. परिणामी मराठा सेवा संघाचा एकजिनशीपणा अस्ताव्यस्त झाले आहे. पदाधिकारी आपआपल्या पदांना न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे संवाद व संपर्क तुटला आहे. तो पुनर्स्थापित करणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने आपण व आपले काही निवडक सहकारी पुन्हा एकदा मराठा सेवा संघाची पुनर्बांधणी करण्याच्या हेतूने घराबाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत साशंकता मराठा आरक्षणाबाबत बोलताना अ‍ॅड.खेडेकर म्हणाले, मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश असावा, ही मराठा सेवा संघाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ इच्छिते. आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत साशंकता असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा.अर्जुन तनपुरे, डॉ.दिलीप महाले, दिगंबर जगताप, प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, प्रवीण कदम, प्रकाश बेद्रे, यशवंत चौधरी, प्रभाकर टेटर आदी उपस्थित होते.