शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

दिवाळीला घरी कापसाचे बोंडही नाही

By admin | Updated: October 22, 2014 23:25 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून यंदा तर दिवाळीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंड आले नाही. दरवर्षी दसऱ्यातच शेतकऱ्यांच्या घरी कापूस येतो. या कापसावरच

पुसद : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून यंदा तर दिवाळीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंड आले नाही. दरवर्षी दसऱ्यातच शेतकऱ्यांच्या घरी कापूस येतो. या कापसावरच दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने दिवाळी अंधारात साजरी करावी लागत आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण सर्वच जण उत्साहात साजरा करतात. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतात. कपडेलत्त्यापासून तर घराचे रंगरंगोटीपर्यंत कामे केली जातात. नोकरदार कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना शेतकरी मात्र हतबल दिसत आहे. तालुक्यात यावर्षी सुरुवातीपासूनच अत्यल्प पाऊस झाला. पावसाचे सुरुवातीचे नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे पेरणी उशिरा झाली. त्यानंतर जेमतेम पावसात पेरणी आटपावी लागली. त्यानंतर पावसाने दीड महिना दडी मारली. याचा परिणाम पिकांवर झाला. उडीद, मूग उद्ध्वस्त झाले. सोयाबीन, तूर, ज्वारी, कपाशीची वाढ खुंटली. सोयाबीन फुलोऱ्यावर आले. त्यावेळेस किडींनी आक्रमण केले. मोझॅक रोगाने पाने पिवळी पडून सोयाबीन उद्ध्वस्त झाले. दरवर्षी १००-१०० पोते सोयाबीन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात यावर्षी दहा पोतेही सोयाबीन आले नाही. सोयाबीन काढणीलाही परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. सोयाबीन पोत्याने नव्हे तर किलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोयाबीन प्रमाणेच कपाशीचीही स्थिती आहे. दिवाळीपूर्वी कापूस शेतकऱ्यांच्या घरी येतो. नव्या कापसाची वात दिवाळीतील दिव्यांसाठी वापरली जाते. घरी आलेला कापूस विकून दिवाळी आनंदात साजरी केली जाते. परंतु यंदा कापसाचे बोंडही घरी आले नाही. अपरिपक्व बोंडे फुटत आहे. पणननेही अद्याप कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे.पुसदच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी त्यात शेतकरी अत्यल्प आहे. खरेदी करणारे शेतकरी हातचे राखून खरेदी करताना दिसत आहे. उधार-उसने करून मुलाबाळांसाठी नवीन कपडे घेण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक कार्यकर्त्यांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. (तालुका प्रतिनिधी)