शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

जिल्ह्याची लालदिव्यांची परंपरा खंडित

By admin | Updated: November 1, 2014 01:10 IST

महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत.

यवतमाळ : महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत. परंतु यावेळी पहिल्यांदाच भाजपा सरकारमध्ये लालदिव्यांची ही परंपरा खंडित झाली आहे. राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचे वेगळे महत्व आणि वजन आहे. हे महत्व प्रत्येकच सरकारमध्ये अधोरेखित झालेले पाहिले गेले आहे. यवतमाळ जिल्ह्याने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने तब्बल साडेतेरा वर्ष महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व दिले. तेव्हापासून राज्यात सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याला लालदिवा अर्थात मंत्री पद मिळाले नाही, असे कधी घडले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तर किमान दोन मंत्रीपदे आणि तिही कॅबिनेट दर्जाची ठरलेलीच असायची. मावळत्या सरकारमध्येसुद्धा शिवाजीराव मोघे, मनोहरराव नाईक हे कॅबिनेट मंत्री होते. वसंतराव पुरके यांच्या रुपाने विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आणखी एक लालदिवा जिल्ह्याला मिळाला होता. एवढेच नव्हे तर १९९५ मध्ये भाजपा-शिवसेना युती शासनाच्या काळातसुद्धा यवतमाळ जिल्ह्याला राजाभाऊ ठाकरे यांच्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून लालदिवा मिळाला होता. परंतु यावेळी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा लालदिवा विझल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात कुण्या पक्षाचे नवे सरकार स्थापन होत आहे आणि त्यात यवतमाळ जिल्ह्याला प्रतिनिधीत्व नाही, हा प्रकार पहिल्यांदाच घडतो आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन लालदिवे होते. नव्या सरकारमध्ये एकही दिवा मिळाला नाही. भाजपा सरकारने अप्रत्यक्ष जिल्ह्याचे नुकसान केल्याच्या आणि पहिल्याच टप्प्यात लालदिवा मिळविण्याची जिल्ह्याची राजकीय परंपरा खंडित केल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)