शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची लालदिव्यांची परंपरा खंडित

By admin | Updated: November 1, 2014 01:10 IST

महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत.

यवतमाळ : महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत. परंतु यावेळी पहिल्यांदाच भाजपा सरकारमध्ये लालदिव्यांची ही परंपरा खंडित झाली आहे. राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचे वेगळे महत्व आणि वजन आहे. हे महत्व प्रत्येकच सरकारमध्ये अधोरेखित झालेले पाहिले गेले आहे. यवतमाळ जिल्ह्याने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने तब्बल साडेतेरा वर्ष महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व दिले. तेव्हापासून राज्यात सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याला लालदिवा अर्थात मंत्री पद मिळाले नाही, असे कधी घडले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तर किमान दोन मंत्रीपदे आणि तिही कॅबिनेट दर्जाची ठरलेलीच असायची. मावळत्या सरकारमध्येसुद्धा शिवाजीराव मोघे, मनोहरराव नाईक हे कॅबिनेट मंत्री होते. वसंतराव पुरके यांच्या रुपाने विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आणखी एक लालदिवा जिल्ह्याला मिळाला होता. एवढेच नव्हे तर १९९५ मध्ये भाजपा-शिवसेना युती शासनाच्या काळातसुद्धा यवतमाळ जिल्ह्याला राजाभाऊ ठाकरे यांच्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून लालदिवा मिळाला होता. परंतु यावेळी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा लालदिवा विझल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात कुण्या पक्षाचे नवे सरकार स्थापन होत आहे आणि त्यात यवतमाळ जिल्ह्याला प्रतिनिधीत्व नाही, हा प्रकार पहिल्यांदाच घडतो आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन लालदिवे होते. नव्या सरकारमध्ये एकही दिवा मिळाला नाही. भाजपा सरकारने अप्रत्यक्ष जिल्ह्याचे नुकसान केल्याच्या आणि पहिल्याच टप्प्यात लालदिवा मिळविण्याची जिल्ह्याची राजकीय परंपरा खंडित केल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)