शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

जिल्ह्याची लालदिव्यांची परंपरा खंडित

By admin | Updated: November 1, 2014 01:10 IST

महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत.

यवतमाळ : महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत. परंतु यावेळी पहिल्यांदाच भाजपा सरकारमध्ये लालदिव्यांची ही परंपरा खंडित झाली आहे. राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचे वेगळे महत्व आणि वजन आहे. हे महत्व प्रत्येकच सरकारमध्ये अधोरेखित झालेले पाहिले गेले आहे. यवतमाळ जिल्ह्याने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने तब्बल साडेतेरा वर्ष महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व दिले. तेव्हापासून राज्यात सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याला लालदिवा अर्थात मंत्री पद मिळाले नाही, असे कधी घडले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तर किमान दोन मंत्रीपदे आणि तिही कॅबिनेट दर्जाची ठरलेलीच असायची. मावळत्या सरकारमध्येसुद्धा शिवाजीराव मोघे, मनोहरराव नाईक हे कॅबिनेट मंत्री होते. वसंतराव पुरके यांच्या रुपाने विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आणखी एक लालदिवा जिल्ह्याला मिळाला होता. एवढेच नव्हे तर १९९५ मध्ये भाजपा-शिवसेना युती शासनाच्या काळातसुद्धा यवतमाळ जिल्ह्याला राजाभाऊ ठाकरे यांच्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून लालदिवा मिळाला होता. परंतु यावेळी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा लालदिवा विझल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात कुण्या पक्षाचे नवे सरकार स्थापन होत आहे आणि त्यात यवतमाळ जिल्ह्याला प्रतिनिधीत्व नाही, हा प्रकार पहिल्यांदाच घडतो आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन लालदिवे होते. नव्या सरकारमध्ये एकही दिवा मिळाला नाही. भाजपा सरकारने अप्रत्यक्ष जिल्ह्याचे नुकसान केल्याच्या आणि पहिल्याच टप्प्यात लालदिवा मिळविण्याची जिल्ह्याची राजकीय परंपरा खंडित केल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)