शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

जिल्ह्याची लालदिव्यांची परंपरा खंडित

By admin | Updated: November 1, 2014 01:10 IST

महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत.

यवतमाळ : महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत. परंतु यावेळी पहिल्यांदाच भाजपा सरकारमध्ये लालदिव्यांची ही परंपरा खंडित झाली आहे. राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचे वेगळे महत्व आणि वजन आहे. हे महत्व प्रत्येकच सरकारमध्ये अधोरेखित झालेले पाहिले गेले आहे. यवतमाळ जिल्ह्याने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने तब्बल साडेतेरा वर्ष महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व दिले. तेव्हापासून राज्यात सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याला लालदिवा अर्थात मंत्री पद मिळाले नाही, असे कधी घडले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तर किमान दोन मंत्रीपदे आणि तिही कॅबिनेट दर्जाची ठरलेलीच असायची. मावळत्या सरकारमध्येसुद्धा शिवाजीराव मोघे, मनोहरराव नाईक हे कॅबिनेट मंत्री होते. वसंतराव पुरके यांच्या रुपाने विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आणखी एक लालदिवा जिल्ह्याला मिळाला होता. एवढेच नव्हे तर १९९५ मध्ये भाजपा-शिवसेना युती शासनाच्या काळातसुद्धा यवतमाळ जिल्ह्याला राजाभाऊ ठाकरे यांच्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून लालदिवा मिळाला होता. परंतु यावेळी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा लालदिवा विझल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात कुण्या पक्षाचे नवे सरकार स्थापन होत आहे आणि त्यात यवतमाळ जिल्ह्याला प्रतिनिधीत्व नाही, हा प्रकार पहिल्यांदाच घडतो आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन लालदिवे होते. नव्या सरकारमध्ये एकही दिवा मिळाला नाही. भाजपा सरकारने अप्रत्यक्ष जिल्ह्याचे नुकसान केल्याच्या आणि पहिल्याच टप्प्यात लालदिवा मिळविण्याची जिल्ह्याची राजकीय परंपरा खंडित केल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)