शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला पांदण रस्त्यांचा अहवाल

By admin | Updated: May 16, 2015 00:01 IST

उमरखेड तालुक्यातील ८० पांदण रस्त्यांची कामे रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल आणि जिल्हा ...

कारवाईचे संकेत : महसूल-जिल्हा परिषद बांधकाममध्ये खळबळ उमरखेड : उमरखेड तालुक्यातील ८० पांदण रस्त्यांची कामे रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली. पांदण रस्त्यांची कामे का सुरू केली नाही याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना मागितला आहे. या अहवालानंतर संबंधितांवर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहे.सहा महिन्यांपासून उमरखेड तालुक्यातील ८० पांदण रस्त्यांची कामे रखडली आहे. या पांदण रस्त्यांसाठी १८ कोटी ६० लाख रुपये मंजूर आहेत. परंतु त्यानंतरही परजना ते साखरा, पोफाळी ते अंबाळी, बारा ते बेलखेड, झाडगाव ते विडूळ, अंबाळी जंगल ते अंबाळी गाव, बारा ते पैनगंगा, ब्राम्हणगाव ते चातारी, ढाणकी, निंगनूर, बिटरगाव, मोरचंडी, मुरली, पिंपळगाव, चुरमुरा, मानकेश्वर, तरोडा, टाकळी, मरसूळ, कृष्णापूर, लोहरा, मार्लेगाव, बाळदी आदी गावातील पांदण रस्त्यांचा समावेश आहे. काही पांदण रस्त्याचे काम अर्धवट तर काही पांदण रस्त्यांना सुरुवातही झाली नाही. याबाबतचे वृत्त १३ मे रोजी ‘लोकमत’मधून प्रकाशित झाले. याची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी घेतली. त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल उमरखेडचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडे मागितला. यामुळे महसूल प्रशासन व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पांदण रस्ता कामात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहे. (शहर प्रतिनिधी)आमदारांनी केली चौकशीची मागणीदुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी पांदण रस्त्याचे काम महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु कामच रखडल्याने मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. तसेच रस्ते रखडल्याने शेतकऱ्यांनाही त्रास होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी केली आहे. विकासात्मक कामात हयगय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. हालचालींना वेग‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महसूल प्रशासन व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रखडलेल्या रस्त्यांच्या कामाला गती देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. बांधकाम विभागाकडून दोन दिवसात अनेक गावच्या पांदण रस्त्याच्या कामासाठी मजुरांनी मागणी केली आहे. त्यामुळे थंडबस्त्यात पडलेली कामे लवकर सुरू होण्याची आशा आहे.