शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जिल्ह्यात ७४ लाख खड्ड्यांचे जिओ टॅगिंंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:37 IST

वनविभागाकडून २०१६ पासून वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. यावर्षी जिल्ह्यात १ कोटी ३७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या मोहिमेतून लावलेले ६५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे.

ठळक मुद्देएक कोटी ३७ वृक्षारोपण : तीन वर्षात ६५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनविभागाकडून २०१६ पासून वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. यावर्षी जिल्ह्यात १ कोटी ३७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या मोहिमेतून लावलेले ६५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे.शतकोटी वृक्षलागवड मोहीम यावर्षी ३३ कोटी वृक्षलागवड या नावाने राबविली जात आहे. जिल्ह्यात या मोहीमेसाठी वन विभागासह एकूण ३३ विभाग तयारीला लागले आहे. यात वन विभाग, ग्रामपंचायत यांचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. तर प्रत्येक शासकीय विभागाने वैयक्तिक उद्दिष्ट ठेवून वृक्षारोपण केले जात आहे. ग्रामपंचायतीला ३८ लाख ४४ हजार, विविध ३३ विभागांना एकूण २० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १ कोटी ४ लाख लागवडीचे नियोजन केले आहे. यासाठी ७३ लाख ६७ हजार खड्डे तयार केले असून बोगस कारभाराला आळा घालण्यासाठी या खड्ड्यांना जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. स्थळनिश्चिती केल्याने प्रत्यक्ष नियंत्रण ठेवता येणार आहे. जिओ टॅगिंगमुळे लागवड केलेले रोप आणि स्थळ यावर आॅनलाईन वॉच राहणार आहे.यामुळे संपूर्ण कामाचीच पारदर्शकता पहायला मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलेली आकडेवारी ग्राह्य धरली जाणार नाही. प्रत्यक्ष आॅनलाईन खड्ड्याच्याच नोंदी मान्य केल्या जाणार आहेत. यामुळे एकाच खड्ड्याचे चार बाजूने घेतलेले फोटो आता चालणार नाहीत. यामुळे बोगसपणाला पूर्णविराम मिळणार आहे.वृक्षसंगोपन बेदखल, वनविभागाचा दावा फसवावृक्षरोपणाचे रेकॉर्ड करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा धडपडत आहे. प्रत्यक्ष लावलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी शासनाने कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे २०१६ मध्ये लावेलेल्या १६ लाख १६ हजार वृक्ष, २०१७ मध्ये २९ लाख ८२ हजार, २०१८ मध्ये लावलेल्या ६० लाख ८४ हजार वृक्षांचे काय झाले, याचा रेकॉर्ड वनविभागाकडे नाही. जून महिन्यात लागवड झाल्यानंतर आॅक्टोबर महिन्यात सरासरी ६५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल देण्यात आला. प्रत्यक्ष उन्हाळ््यानंतर काय स्थिती होती, हे जाणून घेण्याची तसदी वन विभागाने घेतली नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग