शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्हा राजकीय संवेदनशील

By admin | Updated: February 11, 2017 00:10 IST

जिल्ह्याला तब्बल तीन खासदार, विधानसभेचे सात आमदार आणि विधानपरिषदेचे चार आमदार लाभले आहे.

आठ तालुके केंद्रबिंदू : प्रशासनाचे सामाजिक स्थितीवर लक्ष यवतमाळ : जिल्ह्याला तब्बल तीन खासदार, विधानसभेचे सात आमदार आणि विधानपरिषदेचे चार आमदार लाभले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या सर्वांची प्रतिष्ठा पणास लागली असून प्रशासनाच्या दृष्टीने आठ तालुके राजकीयदृष्ट्या हालचालींचे ठरणार आहे. जिल्ह्याला हंसराज अहीर, भावना गवळी व अ‍ॅड. राजीव सातव, असे तीन खासदार लाभले. अहीर आता केंद्रात गृहराज्यमंत्री आहेत. आमदारांपैकी मदन येरावार पालकमंत्री, तर संजय राठोड महसूल राज्यमंत्री आहेत. जिल्ह्यावर भाजपा आणि शिवसेनेचे प्राबल्य आहे. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांची स्थिती खालावल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून जोरकस प्रयत्न होणार आहे. जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसकडून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, तर भाजप-शिवसेनेकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडून हालचाली होत आहे.सत्ताधारी भाजपा, शिवसेनेकडून मतदारांना विविध प्रलोभने, आमिषे दाखविण्याचा प्रकार घडण्याची शक्यता प्रशासनाला वाटत आहे. विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून नोटबंदी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत हालचाली राहण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या सर्व बाबींमुळे यवतमाळ, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, आर्णी, वणी आणि नेर हे आठ तालुके प्रशासनाच्या लेखी राजकीय हालचालींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या आठ तालुक्यांत राजकीय वादाचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. मागील नगरपरिषद निवडणुकीत विरोधी पक्षांनी यवतमाळ व वणी येथे भाजपाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाल्यामुळे मतदान यंत्रात सेटींग केल्याचा आरोप करीत राजकीय वाद निर्माण केला होता. त्यामुळे यावेळी प्रशासन अधिक दक्ष आहे. जिल्ह्याची जातीय स्थिती सामान्य असली, तरी काही तालुक्यांत मूलतत्त्ववादी शक्तींच्या हालचाली वाढत आहेत. त्यासाठी प्रशासनाला जादा पोलीस बंदोबस्त लावावा लागणार आहे. (शहर प्रतिनिधी) निवडणुकीत विविध मुद्दे चर्चेत जिल्ह्याची समाजिक स्थिती सामान्य आहे. तथापि आरक्षण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा रद्द करावा, या मागणीसाठी मराठा समाजाकडून, तर अ‍ॅट्रॉसीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व इतर मागण्यांसाठी दलित संघटनाकडून हालचाली सुरू आहे. मुस्लीमांना आरक्षण द्यावे, गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा, या मागण्यांसाठी मुस्लीम संघटनांकडून हालचाली सुरू आहे. कर्मचारी आणि कामगारांकडून वेतन वाढीसाठी आंदोलन होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. हे सर्व मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.