शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वर्षभरात सहा हजार गंभीर गुन्ह्यांची नोंद

By admin | Updated: December 26, 2015 03:18 IST

मावळत्या वर्षात जिल्ह्याभरामध्ये तब्बल सहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे आहेत.

शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे : पोलीस पाटलाचा खून, यवतमाळातील तिहेरी हत्याकांडही गाजलेयवतमाळ : मावळत्या वर्षात जिल्ह्याभरामध्ये तब्बल सहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. जिल्ह्यातील यावली इजारा येथील पोलीस पाटलाचा दारूविके्रत्यांनी केलेला खून आणि नवरात्र संपताच यवतमाळ शहरात घडलेले तिहेरी हत्याकांड सर्वसामान्यांचा थरकाप उडविणारे होते. शरीर दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये विभागात आघाडीवर असलेले शहर म्हणून यवतमाळची नोंद आहे. येथे संघटीत गुन्हेगारी विशेष सक्रिय नसली तरी, सातत्याने खुनांच्या घटना घडतात. वर्षभरात ७० खून झाले आहेत. ६६ जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. बलात्काराच्या ९२ घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील यावली इजारा येथे दारूबंदीसाठी पुढाकार घेणारे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांचा दारू विक्रेत्यांनी खून केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यातच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात दारूबंदीची मागणी पुढे आली. घाटंजी तालुक्यातील क्रुरकर्मा मामाला नात्यातील अल्पवयीन भाचीवर बलात्कार व खुनाच्या आरोपात शत्रुघ्न मेश्राम याला दुहेरी फाशीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली. विशेष म्हणजे हाच निकाला उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यानंतर गणपती उत्सवाच्या काळात यवतमाळ शहरात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना घडल्या. पत्नीनेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केला. तर कुख्यात असलेल्या सलिम इक्काचा त्याच्याच साथिदारांनी दगडाने ठेचून खून केला. यापूर्वी देवीनगरातील विद्यार्थिनीला भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून भोसकण्यात आले. तिचा रुग्णालयात दुर्दवी अंत झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनांनी जिल्हा हादरला. पोलीस यंत्रणेने गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये तत्परता दाखविली आहे. डिटेक्शनची टक्केवारीही ७७ टक्के इतकी आहे. झालेल्या पाच हजार ९७१ गुन्ह्यांपैकी चार हजार ६१४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची संख्याही एक हजार १७३ ने घटली आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत सात हजार १४४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. असे असले तरी खुनाच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाली आहे. दुचाकी चोरींचे ३१ गुन्हे, नवविवाहितांच्या आत्महत्यात १३ ने वाढ, इतर आत्महत्या, निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे प्रकार या वर्षात वाढले आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवरच्या हल्ल्यात घट झाली असून, वर्षभऱ्यात केवळ ११४ प्रकरणे पोलिसांत दाखल आहेत. इतर गुन्ह्यातही घट झाली आहे. सरासरी २०१४ च्या तुलनेत २०१५मध्ये गुन्हेगारीत किंचीत का होईना घट झाल्याचे दिसून येते. मात्र पोलिसांनी खुनासारख्या घटना व जबरी चोरी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. हे सरत्या वर्षातील आकडेवारीवरून दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)